जळगाव (प्रतिनिधी) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून बिहार व उत्तर प्रदेश मधील पीडितांना जाळून मारल्याबद्दल जळगाव सर्व पक्षीय व सर्व धर्मीय शिष्टमंडळातर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून शासनास याबद्दल साकडे घालण्यात आले आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून जळगाव येथील सर्व धर्मीय व सर्वपक्षीय समाज बांधवाचे शिष्टमंडळाने बिहार येथील एका मुस्लिम मुली सोबत दोन गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास प्रतिकार केल्याने तिला दुसऱ्या दिवशी येऊन रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले तर उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमध्ये पंधरा वर्षीय दलित मुलीसोबत अत्याचार करण्यात आला त्या अत्याचाराची तक्रार केल्याने ती तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणले. परंतु मुलीने न ऐकल्याने तिला सात गुंडांनी घरात येऊन झाळून ठार मारले.
दोघी पीडितांची आर्त हाक
दोघी मयत या अल्पसंख्यांक समाजातील असल्याने बिहार सरकार उत्तर प्रदेश सरकार यांनी त्वरित कोणतीही कारवाई केली नाही बिहार मधील मुलीला जाळून ती १७ दिवस जिवंत राहीली तोपर्यंत त्यांनी आरोपींना अटक केलेली नाही त्या आरोपींवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नव्हता शेवटी मुलीच्या आई, बहीण ,भावाने हे प्रेत प्रशासनाच्या दारावर ठेवले तेव्हा प्रशासन हादरले व विसाव्या दिवशी त्यांनी कारवाई केली. बुलंद शहर मधील १५ वर्षीय दलित मुली वर अत्याचार करण्यात आला सदर तक्रार नोंदवण्यात आली परंतु ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून त्या मुलीवर दबाव येत होता मुलीने तक्रार मागे न घेतल्याने तिच्या घरात येऊन या सात नराधमांनी तिला जिवंत जाळले.
राष्ट्रपती यांना निवेदन
दोन्ही गंभीर प्रकरणी महामहीम राष्ट्रपती यांनी वैयक्तिक लक्ष देऊन याप्रकरणी त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित राज्य शासनाला देण्यात यावे तसेच आंध्र प्रदेश शासनाने ज्या प्रमाणे दिशा हे बिल पारित करून गॅंग रेप बाबत २१ दिवसाच्या आत जलद न्यायालयात खटला चालून न्याय देण्यात यावा तोच कायदा संपूर्ण भारतात राबविण्यात यावा , तसेच पीडितांच्या कुटुंबियांना संरक्षण व एकास शासकीय नौकरी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपती यांना केलेली आहे जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत निवेदन
जळगाव शहरातील सर्व व धर्मीय पक्षीय शिष्टमंडळात प्रमुख्याने समन्वयक फारुक शेख ,सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादीच्या सौ प्रतिभा शिरसाठ, अभेद्य फाऊंडेशनच्या वैशाली झालटे , शिव सेनेचे महानगर अध्यक्ष (अल्पसंख्याक),मन्यार बिरादरी च्या शहनाज यासिन, अक्सा फाउंडेशनच्या शबीना सय्यद,मर्कज क्लब च्या ताहेरा नईम , राष्ट्रवादी चे मजहर खान, सिकलगर बिरदारीचे अनवर खान,हरीश रोशनी एज्युकेशनच्या ताहेरा शेख नइम, शिकलगर फाउंडेशन चे नसरीन शेख शकील, कॉम्रेट अकिल पठाण,रिझवान हरिस, मरकज ग्रुपचे मुजाहिद खान व मोहसीन खान आदी उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी श्री राहुल पाटील यांना निवेदन दिले
शिष्टमंडळाचे काळे फिती(मास्क) लावून निषेध
सर्वप्रथम या शिष्टमंडळाचे समन्वयक फारुक शेख यांनी सविस्तर माहिती सादर केली व रोज होणारे महिलावरील अत्याचार अन्याय व त्यांना जीवाशी ठार करण्यात येत असल्याबद्दल त्रिव चिंता व्यक्त केली व यासाठी शासनाने गंभीर रित्या असे प्रकरण त्वरित जलद न्यायालयात पाठवून निकाल लावा व त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी माहिती दिली.
झाशीची राणी जयंती व शासनाला निवेदन
आज १९ नोव्हेंबर असल्याने याच दिवशी १८२८ साली राणी लक्ष्मीबाई या धर्तीवर आल्या व त्यांनी शत्रू वर आक्रमण केले त्या प्रमाणे आमच्या बघिनींनी त्यांचे अनुकरण करावे म्हणून आजच्या दिवसाची निवड करण्यात आल्येचे फारूक शेख यांनी सांगितले.