धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील महिलेने अनावधानाने सकाळी गुळण्या करण्यासाठी चुकून बादलीतील फिनाइलचे पाणी पिल्याने तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २२ मे रोजी घडली आहे. केवलबाई गुलाब पाटील (वय ६२, रा. अनोरे ता. धरणगाव), असे मयत महिलेचे नाव आहे.
बुधवारी दि. २२ मे रोजी घरातील फरशी पुसण्यासाठी बादलीमध्ये फिनाईल पाणी टाकण्यात आले होते. केवलबाईंना ते माहिती नसल्याने त्यांनी चुकून ते पाणी गुळण्या करण्यासाठी तोंडात टाकले. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ कुटुंबीयांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून केवलबाई यांना मयत घोषित केले.