जळगाव (प्रतिनिधी) शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. तसेच आपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. असे ही जनरल मॅनेजर अतुल कुमार यांनी न्हाई चे चेअरमन याना अहवाल सादर केलेला होता. सर्व्हिस रोड व अंडर पास नसल्याने फेटल अपघात झाल्यास अथवा गंभीर दुखापत झाल्यास त्यास सर्वंस्वी न्हाई जवाबदार राहील व त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात येईल, असे सुद्धा या निवेदनात म्हटले आहे.
शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाने कामाचा वेग घेतला असला तरी २७ जुलै २०१८ रोजी राष्ट्रीय राजमार्ग दिल्ली च्या मुख्य कार्यालयाने दिलेल्या स्पष्ट निदर्शना अनुसार वारंवार होणारे अपघात याची गांभीर्याने दखल घेऊन ज्या सूचना पारित केल्या होत्या, त्यात स्पष्टपणे नमूद आहे की दोन्ही बाजूला साडेसात मीटरचे रस्ते तयार करून (फोर लेन) दोन्ही बाजूला साडेपाच मीटरचे सर्विस रोड, दोन्ही बाजूस फूटपाथ, आवश्यक तेथे उड्डाणपूल, चौक सुधारणा, पादचाऱ्यांसाठी अंडरपास तयार केले जावेत. चौपदरीकरणामुळे वाहनाचा वेग वाढेल व अपघाताचे प्रमाण वाढतील. असे ही जनरल मॅनेजर अतुल कुमार यांनी न्हाई चे चेअरमन याना अहवाल सादर केलेला होता.
सर्विस रोड बाबत न्हाई फक्त आश्वासन देत असून काम करत नाही – फारूक शेख
महामार्ग चौपदरीकरण मार्गावर वर्ष अखेरच्या सप्ताहात लागोपाठ दोन अपघातात होऊन दोन जीविताची हानी झाली. न्हाई चे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिंन्हा हे फारुक शेख यांच्या शिष्टमंडळाला तसेच नगरसेवक रियाज बागवान यांच्या शिष्टमंडळाला सर्विस रोड तयार करून देतो, असे १० डिसेंबर व २१ डिसेंबर च्या ठिय्या आंदोलनात सांगितले परंतु अद्याप त्यांनी सुरुवात केलेली नाही. वास्तविक पाहता २७ जुलै २०१८ च्या निदर्शना नुसार सर्विस रोड आवश्यक आहे.
वर्ष अखेरच्या दिवशी तीन विविध मागण्याचे निवेदन सादर
सालार नगर- ममता हॉस्पिटल येथील नियोजित अंडर पासचे कार्य कोणत्याही परिस्थितीत होणे आवश्यक आहे. या मागणीची तक्रार राखून खालील तीन मागण्या करण्यात आल्या.
१) अजिंठा चौक ते इच्छादेवी या दोन्ही मार्गाचे सर्विस रोड त्वरित तयार करण्यात यावे.
२) अजिंठा चौकापासून मिल्लत हायस्कूल कडे जाणाऱ्या जुन्या अंडरपास मधून जो पाण्याचा निचरा होतो, तेथील तीन पैकी एका मार्गात दोन चाकी, तीन चाकी व पायी जाणाऱ्या साठी मार्ग उपलब्ध करून द्यावा.
३) चेंज ऑफ स्कोप मधील शिल्लक असलेल्या दोन ते तीन कोटी रुपयेच्या रकमेतून अंडर पासच्या ठिकाणी फुट ओवर ब्रिज तयार करून देण्यात यावा. जेणेकरून सालार नगर कडील बाजूस असलेल्या ईदगाह, कब्रस्थान, शाळा तसेच ममता हॉस्पिटल बाजूला असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय, आय टी आय व जिल्ह्यातील सर्वात मोठे मदर्से, १० मशिदी यांच्याकडे जाणे-येणे साठी हा फूट ओव्हर ब्रिज अत्यंत आवश्यक असल्याने त्याची उभारणी त्वरित करावी. जेणे करून ममता हॉस्पिटल बाजूस असलेल्या २५ ते ३० हजार नागरी वस्ती मधून सालार नगर ईदगाह व कब्रस्थान कडे जनाजा (तिरडी) आणू शकू तसेच ममता हॉस्पिटल कडे शाळा, महाविद्यालय, मदरसे कडे जाण्यास या फूट ओव्हर ब्रिजचा वापर होऊ शकतो. अशी मागणी सुद्धा फारुक शेख यांनी निवेदनाद्वारे केली असून त्यासोबत एक नकाशा सुद्धा जोडलेला आहे.
निवेदनाच्या प्रति सादर
सदर निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गुलाबराव पाटील, मा. खासदार उनमेश पाटील, जिल्हा अधिकारी डॉक्टर अभिजित राऊत व जळगाव न्हाई चे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना देण्यात आलेली आहे.
नववर्षात शहरातील महामार्गावर अपघात झाल्यास न्हाई जवाबदार
शहरातील चौपदरीकरणामुळे वाहनाचा वेग वाढलेला आहे. सर्व्हिस रोड व अंडर पास नसल्याने फेटल अपघात झाल्यास अथवा गंभीर दुखापत झाल्यास त्यास सर्वंस्वी न्हाई जवाबदार राहील व त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात येईल, असे सुद्धा या निवेदनात म्हटले आहे.