जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कुलगुरुंची निवड नव्या विद्यापीठ कायद्यानुसार करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सचिव अँड. कुणाल पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येणाऱ्या आगामी कुलगुरू यांची निवड प्रक्रिया सुरू करायच्या तयारीत आपण आहोत. आपल्या विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणेसाठी सूचना झाल्या होत्या त्याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी होऊन नवी कुलगुरू निवड ही नव्या विद्यापीठ कायद्याप्रमाणे करावी. कारण कोण्या एका विचारसरणीचा पगडा त्या विद्यापीठमध्ये पडणार नाही. त्याचप्रमाणे तेथे चुकीचे ठराव सीनेटमध्ये मंजूर करून आर्थिक भ्रष्टाचाराला आळा बसेल तसेच विद्यापीठामध्ये परीक्षा प्रशासन रोजंदारी कर्मचारी यांची कामे सुरळीतपणे पार पडतील. आपण निवड केलेल्या समितीमध्ये प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता यांचे नाव आहे. परंतु, त्यांना मागील काळात विद्यापीठ प्रशासन व भ्रष्टाचार विषयी वेळोवेळी तक्रार केल्या त्याबाबत चौकशी करण्यात येईल व त्या तक्रारी सचिव गुप्ता यांच्याकडे दिले असल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडून ईमेल प्राप्त झाले होते व आहेत. परंतु एका प्रकरणात देखील त्यानी चौकशी केली नाही म्हणून कुठ तरी काही तरी चुकल्यासारखा वाटत आहे. म्हणून विनंती की आपण नवीन कुलगुरू निवड ही नव्या कायद्यानुसार करावी. असे यात म्हटले आहे.