नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘सरकारकडून ‘मोदी राजीनामा द्या’ (#ResignModi) हा हॅशटॅग हटवण्याचे निर्देश देण्यात आले नव्हते, असा खुलासा केंद्रातील मोदी सरकारकडून करण्यात आलाय. दरम्यान, फेसबुकनंही हे स्पष्ट केलंय की हा हॅशटॅग चुकीनं हटवण्यात आला होता’ असं ‘भारत सरकार’नं म्हटलं आहे.
#ResignModi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेन्ड झाल्यानंतर तो ब्लॉक करणं हा सार्वजनिक असंतोषावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न होता, असा आरोप अमेरिकेतील एक वर्तमानपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’कडून करण्यात आला होता. हा आरोप संपूर्णत: भ्रामक असल्याचं ‘भारत सरकार’कडून जाहीर करण्यात आलंय. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं ५ मार्च रोजी प्रकाशित केलेल्या बातमीचा उल्लेख करताना, ही बातमी संपूर्णत: बनावट आणि ‘निर्मित’ असल्याचं मोदी सरकारनं म्हटलंय. ‘सरकारकडून हा हॅशटॅग हटवण्याचे निर्देश देण्यात आले नव्हते. फेसबुकनंही हे स्पष्ट केलंय की हा हॅशटॅग चुकीनं हटवण्यात आला होता’ असं ‘भारत सरकार’नं म्हटलंय.
‘भारतानं फेसबुक, व्हॉटसअप आणि ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात धाडण्याची धमकी दिली’ अशा मथळ्याखाली ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं ५ मार्च २०२१ रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती.