मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आणि शिंदे गटातला दसरा मेळाव्याचा वाद वाद दुर्दैवी आहे. , मला आठवतं, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरुन दिलदारपणे पवारांवर टीका करायचे. विरोधक दिलदार असावा, नाहीतर राजकारण करायला मजा कशी येणार?, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधात असतानाची एक आठवणही आज माध्यमांशी बोलताना सांगितली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला आठवतं, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरुन दिलदारपणे पवारांवर टीका करायचे. विरोधक दिलदार असावा, नाहीतर राजकारण करायला मजा कशी येणार? मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या,”हा सगळा वाद दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री पद मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असायला हवं. आमच्याही काळात दसरा मेळावा व्हायचा. आमच्याविरोधात भाषणं व्हायची. आम्हीही उत्सुकतेने आमच्या विरोधात ते काय बोलतात, हे ऐकायचो. त्यामुळे नेता हा फक्त पदाने मोठा होत नाही, तर तो कर्तृत्वाने होतो. त्यामुळे मोठ्या पदावर बसणारा नेता दिलदार असावा. त्यामुळे सध्या जे सुरू आहे, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब आहे.