भुसावळ (प्रतिनिधी) नागपूरहून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली रेल्वेची मालगाडी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. शोधाशोध केल्यानंतर 1 फेब्रुवारीला निघालेली ही मालगाडी 14 फेब्रुवारी रोजी भुसावळ डिव्हिजन मधील शेगाव येथे सापडली. मात्र एक मालगाडी तब्बल 10 दिवस रेल्वेच्या सिस्टमवरून बेपत्ता झाल्यामुळे रेल्वेच्या यंत्रणेवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Nagpur- Mumbai goods train carrying 90 containers untraceable)
नागपूरच्या वेगवेगळ्या एक्सपोर्टर कंपन्यांनी 1 फेब्रुवारी रोजी आपले कंटेनर नागपूर वरून मुंबईच्या जेनपीटी बंदरावर पाठवण्यासाठी रेल्वेला कॉन्ट्रक्ट दिले होते. 1 फेब्रुवारीला ही मालगाडी नव्वद कंटेनर घेऊन नागपूरवरून 4 फेब्रवारी रोजी जेएनपीटीला पोहचणार होती. मात्र, नागपूरवरून काही अंतर पार केल्यावर PJ102040201 ही मालगाडी रेल्वेच्या फ्लुईट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टमवर (FOIF) दिसणे बंद झाली. भारतीय रेल्वेच्या PJT1040201 या क्रमांकाच्या मालगाडीत 90 कंटेनर आहेत. या कंटेनर्समध्ये उच्च प्रतीचा तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर निर्यात करण्याच्या वस्तू आहेत. या मालगाडीचे लोकेशन भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम FOIS मधून अदृश्य झाले होते. FOIS ही रेल्वे डब्यांना लाइव मॉनिटर करण्याची भारतीय रेल्वेची यंत्रणा आहे.
4 फेब्रुवारीला पोहचारी ही मालगाडी कंटेनर घेऊन जेएनपीटी मुंबईला न पोहचल्याने एक्सपोर्टरने स्वत: शोधाशोध केली तर 14 फेब्रुवारी पर्यंत रेल्वेच्या सिस्टर मधून बेपत्ता आहे याची साधी कल्पनाही रेल्वेच्या लोकांना नव्हती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली असता 1 फेब्रुवारीला निघालेली ही मालगाडी 14 फेब्रुवारीला भुसावळ डिव्हिजन मधील शेगाव मध्ये उभी असल्याचे लक्षात आले. काही तांत्रिक कारणामुळे सेंट्रल रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन मध्ये शेगाव जवळ थांबवण्यात आल्याची, आणि आता जेएनपीटीकडे वळवण्यात आल्याची माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
दरम्यान, हा प्रश्न फक्त एक मालगाडी बेपत्ता होण्याचा पुरते मर्यादित नाही तर रेल्वेचे सिक्युरिटी सिस्टम काय करत होते? एक मालगाडी 10 दिवसापासून संपर्काच्या बाहेर आहे तर हे मध्य रेल्वे व कॉंन्कर कंपनीला हा प्रकार वेळेत का कळला नाही? एखाद्या प्रवाशी ट्रेन सोबत असे झाले असते तर ? या सर्व प्रश्नावर सुरक्षा यंत्रणा व मध्य रेल्वेला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.