धरणगाव (प्रतिनिधी) धरणी नाल्यालगत असलेल्या संरक्षण भीतींचे कामकाज निकृष्ठ दर्जाचे चालू होते. हया कामकाजाचे चौकशीसाठी ठाकरे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी आमरण उपोषण मांडले होते. परंतु, अधिका-यानी १५ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणतेही चौकशी न झाल्याने अधिकारी ठेकादारांविरुद्व न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अॅड शरद माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धरणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
अॅड शरद माळी पुढे म्हणाले की, उच्च न्यायालयात धरणगावच्या पाणी प्रश्न बाबत जनहित याचिका क्रं. ६७/२०२४ दाखल करण्यात आली आहे. २२ मार्च २०२२ रोजी धरणगाव येथील पाणी पुरवठा योजना व देखभाल दुरुस्तीसह वर्क ऑर्डर अर्थात कार्यरभं आदेश प्रगती कन्ट्रक्शन लातुर यांना देण्यात आला होता परंतु अद्याप पावेतो धरणगाव करांना पाणी मिळत नाही त्यामुळे हि योजना देखील पुर्णपणे निष्क्रीय ठरलेली आहे. झुमकराम वाचनालयाच्या जागेवर व्यापारी गाळे काढलेले आहेत. ह्या गाळेच्या लिलावासाठी ई-टेन्टर काढण्यात आले. याबाबत सामान्य लोकांना कोणतेही सुचना न देता आधीच काही लोकांकडून अगोदरच पैसे घेवून ठेवलेले असल्याचे बाब समोर येत आहेत. पावसाळा १५ ते २० दिवसांनवर आला असतांना टिळक तलावातील पाण्याचा स्त्रोत जिवंत करुन नागरीकांना पाणी उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे.
ठाकरे गटातील धरणगावातील एक प्रतिष्ठीत जुना नेता भाजपात जाणार असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता अॅड शरद माळी व भागवत चौधरी म्हणाले की, संजय सावंत यांनी पहिली बैठक धरणगावात घेतली असता संबधीत नेत्याच्या डोळयांत अश्रु आले होते. त्यामुळे धरणगावातील ठाकरे गटा सोबतचे सर्वच नेते एकनिष्ठ असून भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ठाकरे गटाचे शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी आपण आमरण उपोषणाना बसले असता अधिकारी यांनी दिशाभूल करुन व आश्वासन देवून आपल्याला उपोषण सोडण्यास भाग पाडण्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला बापू महाजन, रंजीत सिकरवार, परमेश्वर महाजन, अॅड सागर महाजन, विनोद रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.