जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका आदिवासी महिलेसोबत अत्याचार झाल्याचा आरोप करत महिलांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
निवेदन देतांना शिष्ट मंडळाने म्हटले आहे की, तोंडापूर प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अत्यंत साध्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला हे. सदर प्रकरणी गंभीर स्वरूपाचे कलमान्वये गुन्हा दाखल होणे आवश्यक असून पुरवणी कलम वाढवावे. तसेच सदर तपास महिला पोलिस अधिकाऱ्यामार्फत करावा, आरोपीस त्वरित अटक करावी, आदी मागण्यांसाठी आज महिलांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. त्यात म्हटले की, अत्याचार पिडितेला शासनातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, एवढेच नव्हे तर सदर प्रकरणाचा सविस्तर तपास करून १५ दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपण पत्र सादर करावे. तसेच हे प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीस कड़क शिक्षा करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
अध्यक्ष मनियार बिरादरी फारूक शेख यांच्या नेतृत्वात आदिवासी तडवी महिला मंडळाचे अध्यक्ष रफीया बाबू तडवी, उपाध्यक्ष छाया कुंदन तडवी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ,अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या नसरून सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, रिटायर डेप्युटी कमिशनर जीएसटी एन ए तडवी, रिटायर ट्रेझरी ऑफिसर बाबू इस्माईल तडवी ,काँग्रेस आयचेअल्पसंख्यक अध्यक्ष अमजद पठाण, ह्यूमन राइटचे अनवर खान, तड़वी आदिवासी महिला मंडळाच्या नजमा बी शेख, आलिशान बशारत, अरुणा खुदा बक्श तडवी,हमीदा बाबू, चारुलता सोनवने, मंजुबाई फिरोज तडवी, आबेदा सलीम तडवी, तसलीमा अजित तडवी, फिरदौस तडवी, शिवसेनेच्या गायत्री सोनावणे व चारुलता सोनावणे, यांची उपस्थिति होती.