यावल (प्रतिनिधी) पाण्याची मोटार लावायला गेल्यावर विजेचा धक्का लागल्याने तालुक्यातील कोळवद येथील १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, कोळवद गावातील संजय बिस्मिल्ला तडवी यांची मुलगी मुस्कान संजय तडवी (वय १४) ही मुलगी दिनांक १२ मे रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घरातील पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावत होती. त्याचवेळी मोटारीत विजेचा प्रवाह उतरल्याने मुस्कानला विजेचा धक्का बसला. कुटुंबाने ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ तिला यावल येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणाले. परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुस्कान ही सातोद येथील विकास विद्यालयात आठवीची शिक्षण घेत होती. तिच्या अपघाती मृत्यूने गावात सर्वत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त झाली.