रावेर (प्रतिनिधी) भरधाव बसने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत ३४ वर्षीय तरुण व्यापारी ठार झाल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी घडली. बबन भाऊराव पाटील, असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
तालुक्यातील अजंदे येथील श्री समर्थ कृषी केंद्राचे संचालक बबन पाटील हे धामोडी येथून कांडवेलकडे जात असतांना कांडवेल जवळ एसटीने त्यांच्या मोटारसायकला धडक दिली. या अपघातात बबन पाटील यांचा मृत्यू झाला. धामोडी-कांडवेल रस्त्यावर २१ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
बबन पाटील यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. निंभोरा पोलीस ठाण्यात सुरेश सुधाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. बस चालक जगन्नाथ लवंगे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे करीत हे आहेत. दरम्यान, बबन पाटील हे समर्थ कृषी सेवा केंद्राचे संचालक होते. त्यांच्या मृत्यूने त्यांची पत्नी व दोन ७ व ३ वर्षांची चिमुरडी मुलेही निराधार झाली आहेत. विधवा आईचा एकुलता एक कमावता मुलगा हिरावला गेला आहे.