गाझियाबाद (वृत्तसंस्था) गाझियाबादच्या लोणी बॉर्डर टीला शाहबाजपूर ठाण्याच्या परिसरात बापाने आपल्याच दोन मुलींचा गळा चिरल्याची भयंकर घटना घडली आहे.
शाहबाजपूर गावात राहणाऱ्या सतवीरची पत्नी ज्योतीने सांगितले की, लग्न झाल्यापासून सतवीर दारू आणि गांजाच्या नशेत असायचा. त्यामुळे आपण माहेरच्या घरात राहतो. गावातील माता मंदिरात पूजेसाठी ज्योती आल्यावर सतबीर पत्नीसोबत राहण्याचा हट्ट धरला. पण ज्योती त्याच्यासाठी तयार नव्हत्या. त्यानंतर संतापलेल्या सतवीरने चाकूने मुलींचा गळा चिरला. कौटुंबिक वादातून आरोपी पित्याने असे भयानक पाऊल उचलले आहे. दरम्यान, नशेच्या अवस्थेत पतीने आपल्या मुलींचे गळे चिरल्याचेही ज्योतीने सांगितले.