नांदेड (वृत्तसंस्था) हदगाव येथील एका किराणा व्यापारीने संपत्ती वाटणीच्या वादातून आपल्या परिवारातील ५ सदस्यांसह सहस्रकुंड धबधब्यात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, तिघांचे मृतदेह आढळले असून दोन मुली अद्यापही बेपत्ता आहेत.
प्रवीण कवानकर (४२), पत्नी आश्विनी कवानकर (३८), सेजल (२०), समीक्षा (१४) आणि सिद्धेश (१३) यांनी यवतमाळच्या मुरली गावातून सहस्रकुंड धबधब्यात उड्या मारल्या. बुधवारी प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूरनजीक, तर सिद्धेश व अश्विनी यांचे मृतदेह दराटी (जि. यवतमाळ) परिसरात आढळले. समीक्षा व सेजल यांचा गुरुवारपर्यंत शोध लागलेला नाही. दरम्यान, कवाना येथील रहिवासी भगवानराव कवानकर यांचे हदगावात मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलांत संपत्तीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माेठा मुलगा प्रवीण कवानकर यांनी किराणा दुकानातील हिस्सा मागितला. मात्र तडजोड न झाली नाही. त्यातून परिवाराने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.