धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून शासकीय कापूस केंद्राला सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आज शेतकऱ्यांना एस.के कॉटनमध्ये फोन करून बोलावण्यात आले होते. परंतू याठिकाणी शेतकऱ्यांचा माल मोजून टोकन देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिनिंग समोर रास्तारोको आंदोलन केला होता. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व पालिका गटनेते विनय भावे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत आंदोलकांना शांत केले.
आज दि. १ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा व शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदरहून हे आंदोलन कापूस प्रश्नी होते. गेल्या चार दिवसांपासून धरणगाव येथे शासकीय कापूस केंद्र सुरू करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांना एस.के.कॉटन जिनिंगमध्ये फोन करून बोलावण्यात आले होते. सदरहू शेतकऱ्यांनी आपली नावे धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नावे नोंदणी केली, व प्रत्येक शेतकऱ्यांना फोनवर सूचना दिल्या. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल मोजण्यास व टोकन देण्यास नकार देण्यात आला. एवढेच नव्हे तर आपल्या मर्जीनुसार टोकन देण्यात आले. बाजार समितीच्या अनागोंदी, भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे टोकन अभावी वाहन खाली करण्यात आले नाहीत.
बाजार समितीच्या अधिकारींचे म्हणणे आहे की, आमच्याकडे टोकन शिल्लक नाहीत. दुसरीकडे शासकीय खरेदी ही सात जिनिंग सेंटरवर सुरू असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात नावे नोंदणी करण्याची गरज काय..? प्रत्येक जिनिंगला प्रतिनिधी दिलेले आहे. तर त्याच ठिकाणी टोकन देण्यात यावे. तसेच जिनिंगला विक्रीसाठी आणलेला कापसाची कपात (कट्टी ) करण्यात येते. तर कपात (कट्टी) कोणत्या आधारावर केली जाते. जर का याच्यापुढे शेतकऱ्यांनी आणलेला कापसाची कपात केली तर आम्ही सर्व शेतकरी लवकरच जनआंदोलन करू. यामुळे धरणगाव येथील एस. के.कॉटन जिनिंग जवळ संतप्त शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी शेतकऱ्यांना लवकरच टोकन दिले पाहिजे, शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड , समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी श्री. बारी साहेब यांना सांगितले. श्री.बारी साहेब यांनी गोरख देशमुख व उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की, लवकरात लवकर आम्ही शेतकऱ्यांची समस्या दूर करू. रास्ता रोको वेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ , पो.ना. मिलिंद सोनार , संजय सूर्यवंशी , पो.कॉ.विनोद संदानशीव , दिपकराव पाटील व होमगार्ड यांनी रास्ता रोको सुरळीत केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , नगराध्यक्ष निलेश चौधरी , भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार , गटनेते विनय भावे , बालू जाधव , संजय चौधरी , धिरेंद्र पुरभे , विलास महाजन , भागवत चौधरी व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.