धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोणे गावातील विद्यार्थी धरणगाव येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज ये जा करत असतात. परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या वेळेत बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी बस सुरु करण्याची मागणीचे निवेदन शिंदे गट आणि भोणे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने वाहतूक नियंत्रकांना देण्यात आले.
भोणे ग्रामस्थांनी वाहतूक नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकाळी ६ वाजता आणि १० वाजता व दुपारी आणि संध्याकाळी एस. टी.बस सुरू करण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबेल. या प्रसंगी सरपंच रतिलाल पाटील, उपसरपंच निंबा पवार, ज्येष्ठ शिवसैनिक देविदास पाटील, शाखाप्रमुख समाधान पाटील, दीपक पाटील, भूषण पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, गुलाब शिंदे, सागर पाटील, गजानन फुलपगार, कमलबाई शिंदे, अरुण पाटील तसेच धरणगाव येथील शिवसैनिक विलास महाजन, वाल्मीक पाटील, संतोष महाजन, विजय महाजन, बुटा पाटील, बाळू जाधव, पवन महाजन, कन्हैया महाजन, चंद्रकांत महाजन, किशोर पैलवान, अहमद पठाण, ज्ञानू महाजन, दीपक पाटील, पवन पाटील यांच्या आदी उपस्थित होते.