नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ८५० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५५५ कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. देशात गेल्या २४ तासांत १२,४०३ कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ११,८५० नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, शुक्रवारी देशात १२,४०३ कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. त्याच वेळी, सध्या देशात फक्त १,३६,३०८ सक्रिय रुग्ण शिल्लक आहेत. तर देशात गेल्या २४ तासांत ५५५ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ३ कोटी ४४ लाख २६ हजार ३६ झाली आहे. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ३०८ वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख ६३ हजार २४५ झाली आहे. देशात सलग ३६ दिवस कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या २० हजारांहून कमी आहेत. आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण तीन कोटी ३८ लाख २६ हजार ४८३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत, तर मृत्यूचे प्रमाण सुमारे १.३० टक्के आहे.
दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत १११ कोटीहून अधिक कोरोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी ५८ लाख ४२ हजार ५३० डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे १११ कोटी ४० लाख ४८ हजार १३४ डोस देण्यात आले आहेत.