धरणगाव (प्रतिनिधी) छळ केवळ महिलांचाच होत नाही, तर पुरुषांचाही होतो. त्यामुळे पुरुषांना देखील न्याय मिळावा. तसेच त्यांच्यासाठी देखील कडक कायदे करण्यात यावे, यासाठी आशिष महाले या तरुणाने काही दिवसांपासून उड्डाणपुला शेजारी आमरण उपोषण सुरु केले होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मध्यस्थी केल्यानंतर तरुणाने उपोषण मागे घेतले आहे.
मागील काही दिवसापासून आशिष महाले या तरुणाने उड्डाणपुला शेजारी आमरण उपोषण सुरु केले होते. छळ केवळ महिलांचाच होत नाही, तर पुरुषांचाही होतो. त्यामुळे पुरुषांना देखील न्याय मिळावा. तसेच त्यांच्यासाठी देखील कडक कायदे करण्यात यावे. एवढेच नव्हे तर पुरुष दक्षता समिती तयार करण्यात यावी, अशा मागण्या या तरुणाने सुरु केल्या होत्या. मागील चार-पाच दिवसापासून उपोषण सुरु होते. शेवटी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मध्यस्थी केली. तरुणाची समजूत घातली. त्याच्या कौटुंबिक वादावर मार्ग काढून दिला. यानंतर आशिष महाले या तरुणाने उपोषण मागे घेतले आहे.