मुंबई (वृत्तसंस्था) भोसरीमधील कथित जमीन गैररव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना न्यायालयाने दिलेला दिलासा आता २४ फेब्रुवारीपर्यंत कायम आहे. आज न्यायालयातील युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे.
पुणे तेथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स पाठवले होते. याबरोबर ईडीने खडसे यांना काही प्रश्नही विचारले होते. मात्र आपल्याला कोणतेही समन्स मिळालेले नसल्याचे खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते. तर ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हाच रद्द करावा, अशी खडसे यांनी केली होती. ईडीने बजावलेल्या समन्सला आपण पुन्हा हजर राहिलो आणि त्यावेळी जर ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना त्यांना हवे असल्याप्रमाणे उत्तरे दिली नाही तर अटकेची भीती आहे. म्हणूनच मी हायकोर्टात आलो, असे खडसे यांच्या वकिलांनी हायकोर्टात युक्तिवाद करताना सांगितले होते. परंतू आजचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने मुंबई हायकोर्टाने आता पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला ठेवल्याने तोपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करणार नसल्याची ईडीची हमी कायम राहणार आहे.