धरणगाव (प्रतिनिधी) शेत जमिनीच्या नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत जयंत पुंडलिक भट्ट (महसूल, नायब तहसील) यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेत जमिनीत फेरफार केल्याप्रकरणी भरतसिंग देविदास परदेशी (नशिक), निलेश सुरेश चौधरी (माजी नगराध्यक्ष, धरणगाव), वनराज बुधा पाटील (तत्कलीन मंडळ अधिकारी,साळवा), रोशनी मोरे (तत्कालीन तलाठी नांदेड), मुद्रांक विक्रेता धरणगाव दत्तात्रय चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत देविदास रामदास रडे (रा.नांदेड) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार धरणगाव गट क्षेत्र आहे आर या शेतजमिनीवर इतर कोर्टाचे आदेश नसतांना सदर जमीन फेरफार करण्यात आला. याबाबत महसूलने अहवाल सादर केलेला असून स्थानिक स्वराज संस्था यांना अधिकार नसतांना त्यांनी कोणत्या अधिकारात दाखला दिला. तसेच पदाचा दुरुऊपयोग करून हा दाखला संबंधित व्यक्तीने दिल्याचा आरोप आहे. नियमबाह्य नोंदी करण्यासाठी बेकायदेशीर कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे, यासह ४९ वर्षानंतर वारस नोंद मंजूर करणे, चुकीच्या नोंदीवरून नोंद खारीज करण्याचेही अधिकार असतानाही नोंद मंजूर करणे, चुकीची नोंद पडताळून न बघणे, प्रशासकीय गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, चुकीचा दस्त देणे, चुकीचा दस्त देत शासनाची फसवणूक करणे, यासारखे गंभीर आरोप फिर्यादीत आहेत. पुढील तपास पीएसआय गुंजाळ हे करीत आहेत.
मी फक्त शहरातील रहिवाशी दाखले दिले आहेत. अगदी तेही आधार कार्ड, रेशनकार्ड तपासून दिलेत. यानंतर कुणी आपले सह्यांचे विविध दाखले दिले असतील तर याबाबत आपल्याला माहिती नाही.
– निलेश चौधरी (माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, धरणगाव )
















