TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : जामनेर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाची समिती जळगावात दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2021
in जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गैरव्यवहार प्रकरणी राज्य शासन गठीत चौकशी समिती आज जळगावात दाखल झाली आहे. या बांधकामात २०० कोटींचा अपहार झाला असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा खळबळजनक आरोप ॲड.विजय पाटील यांनी केला होता.

जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गैरव्यवहार झाला असून त्यात साधारण दोनशे कोटीचा अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ॲड. विजय पाटील यांनी राज्य शासनाकडे दिली होती. राज्य शासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत तीन सदस्य चौकशी समिती गठित केली होती. यासंदर्भात नुकताच एक शासन अध्यादेश देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. दरम्यान, या संदर्भात तक्रारदार ॲड. विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आज आपण कामानिमित्त बाहेरगावी आहोत. चौकशी समिती जळगावात आल्याचे मलाही कळाले आहे. याबाबत लवकरच आपण चौकशी समितीची भेट घेऊन सर्व कागदपत्र त्यांच्या समोर सादर करणार आहोत. एवढेच नव्हे तर थेट घटनास्थळी म्हणजेच जामनेर येथे जाण्यासाठी मी समितीकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी ‘द क्लियर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी समितीने जिल्हा परिषदमध्ये जात आज काही महत्वपूर्ण कागदपत्र ताब्यात घेतल्याचे कळते.

READ ALSO

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

जामनेर शहरात जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधा वापरा हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉप्लेक्स बांधताना संबंधित ठेकेदाराने शासनाने दिलेल्या निर्देशांचा भंग केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने एक समिती नेमली आहे. जळगावातील अॅड. विजय भास्कर पाटील यांनी याप्रकरणी तक्रार केली होती.

उपसचिव प्रवीण जैन यांनी मंगळवारी (६ एप्रिल रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार दोन महिन्यात या समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे. नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त मनीष सांगळे या समितीचे अध्यक्ष असून त्याच कार्यालयातील चौकशी विभागाचे सहायक आयुक्त राजन पाटील हे समितीचे सदस्य आहेत. विभागीय कार्यालयातीलच सहायक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे हे सदस्य सचिव असतील. अॅड. विजय पाटील यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने या समितीला चौकशी करायची आहे.

२०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

अँड. विजय पाटील यांनी या कामात २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या व्यापारी संकुलातील गाळे विक्री करून संबंधित खरेदीदारांना चार ते पाच लाख रुपयांच्या पावत्या देण्यात आल्या असल्या तरी काही गाळ्यांसाठी ८० ते ९० लाख रुपये रोखीने घेण्यात आले आहेत. शिवाय, तळमजल्या बेकायदेशीर बांधकाम करून त्याचाही व्यावसायिक उपयोग करण्यात आला आहे. हे करताना २५ जुलै २०११ रोजी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचा पूर्णपणे भंग करण्यात आला आहे. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते आणि शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे उद्घाटन केले होते. तसेच विद्यमान आमदार गिरीश महाजन मंत्री होते. त्यामुळेच हे सर्व गैरप्रकार होऊ शकले आणि जिल्हा परिषद गेल्या १० वर्षात सात कोटी रुपयांपैकी एक पैसाही देण्यात आलेला नाही, असेही अॅड. विजय पाटील यांनी आरोप होता. यासर्व आरोपांसह त्यांनी ३० मार्च २०२१ रोजी राज्याच्या महाविकास विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर सहा एप्रिल रोजी समिती नेमण्याचा शासन निर्णय जाहिर केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
Next Post

‘ब्रेक द चेन’ अतंर्गत निर्बंध लागू ; काय राहणार सुरु, काय राहणार बंद ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ९६ कोरोनाबाधित ; ४१ रुग्ण निगेटिव्ह !

November 25, 2020

बायकोच्या मैत्रिणीसोबत संसाराचा डाव उधळला !

November 3, 2020

मोठी बातमी : रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात !

January 1, 2023

जळगाव येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

January 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group