नागपूर (वृत्तसंस्था) एकतर्फी प्रेम किती घातक वळणावर जाऊ शकते आणि वेळीच मुलींना होणाऱ्या त्रासाची पोलिसांकडे तक्रार केली नाही, तर किती भयावह परिणाम होऊ शकतात याची प्रचिती काल नागपुरात आली आहे. एकतर्फी प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाचा मोईनने खून केला होता. त्यानंतर त्याने स्वत: मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.
काल दुपारी दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी एक्टिव्हाने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री ९ वाजून २६ मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली. केरळ एक्स्प्रेसच्या ड्रायवरने रेल्वे एकाने रेल्वे समोर आत्महत्या केल्याची कंट्रोल रूमला माहिती दिली. रेल्वे कंट्रोल रूम ने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या केल्याची स्पष्ट झाले. लक्ष्मीबाई धुर्वे यांच्या नातीचे व आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध लक्ष्मीबाईंना मान्य नसल्याने त्यांनी दोघांच्या भेटीगाठी बंद केल्या होत्या. धुर्वे कुटुंबीयांनी मुलीला मध्यप्रदेशातील नातेवाईकांकडे ठेवले होते. त्यामुळे आरोपी संतापला होता. या विषयावरून त्याने अनेक वेळा धुर्वे कुटुंबीयांना धमक्या देखील दिल्या होत्या. आरोपीने दिलेल्या धमक्यांना गांभीर्याने त्यांनी घेतले नाही. त्यातच गुरूवारी आरोपीने दुपारच्या सुमारास लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश हे घरी एकटेच असताना बळजबरीने घरात प्रवेश केला आणि त्या दोघांचीही धारधार शस्त्राने वार करुन खून केला. संध्याकाळी लक्ष्मीबाई धुर्वे यांचा मुलगा आणि सून कामावरून घरी परतले तेव्हा या दुहेरी खून प्रकरणाचा खुलासा झाला.