धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कुरेशी मोहल्ला येथे विना परवाना २० गुरं आढळुन आले. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा व पकडण्यात आलेले २० गुरं कायमस्वरूपी संगोपनासाठी कामधेनू गो शाळेत ठेवावे, असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज धरणगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले.
धरणगाव पोलीस स्टेशनला भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवेदन देण्यात आले की, दि. २० जुलै २०२१ रोजी बकरी ईद निमित्ताने पोलीस निरीक्षक व पोलीस स्टॉप सर्च ऑपरेशनसाठी शहरातील कुरेशी मोहल्ला येथे गेले असता त्यांना विना परवाना २० गुरं आढळुन आले. पोलीस निरीक्षक व स्टॉपने सदरील २० गुरं हे धरणगावातील कामधेनू गो शाळेत संगोपनासाठी ठेवण्यात यावे असे लेखी पत्र दिले आहे.
यासाठी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की, सदरील गुरं हे कत्तलीच्या इराद्याने कुरेशी मोहल्ल्यात आणण्यात आले होते तरी आपण या बाबत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा व पकडण्यात आलेले २० गुरं कायमस्वरूपी संगोपनासाठी कामधेनू गो शाळेत ठेवावे असे निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी भाजप ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, राजू महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, शरद भोई, मीडिया प्रमुख टोनी महाजन, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर, गोरक्षा समितीचे श्रीपाद पांडे, किरण वऱ्हाडे, राहुल बयास, आकाश तिवारी आदी उपस्थित होते.