TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव : २०२१ मधील महापूर नुकसानग्रस्तांना मदत म्हणून ६ कोटी ३८ लाखांचे अनुदान मंजूर !

जीवित व पशुधन हानी, घरांची पडझड, गोठे, झोपड्या, कपडे, वस्ती आदींची मिळणार नुकसान भरपाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 29, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट २०२१ या वर्षात अतिवृष्टी, महापूर, ढगफुटीचा मोठा फटका बसला होता. नुकसानग्रस्तांना मदत म्हणून शासनाने ६ कोटी ३८ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. जीवित व पशुधन हानी, घरांची पडझड, गोठे, झोपड्या, कपडे, वस्ती आदींची नुकसान भरपाई मिळणार आहे. दरम्यान, महापूरग्रस्तांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

ऑगस्ट २०२१ महिन्याच्या शेवटी व पुन्हा सप्टेंबर २०२१ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाला होता. त्यामुळे पाटणादेवी अभयारण्य क्षेत्र व गिरणा – मन्याड धरण क्षेत्रात जवळपास एका रात्रीत १४० मिलिमीटर पाऊस झाल्याने प्राथमिक अंदाजानुसार या महापुरात २६६० जनावरांचा मृत्यू, ११२३१ पोल्ट्रीचे पक्षी, २२५० घर व व्यावसायिक दुकानांचे अंशत व पूर्णतः नुकसान, सुमारे १५८०० हेक्टर वरील जमिनी व पिकांचे नुकसान झाले होते.

READ ALSO

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

अचानकपणे आलेल्या महापुरामुळे घरे, जनावरे, गोठाशेड वाहून गेली होती तसेच अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने मोठी वित्तहानी झाली होती. ग्रामीण भागात नदी किनारी असणारी शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांची हजारो छोटी – मोठी जनावरे मृत्युमुखी पडली, नदी किनाऱ्यावरील संपूर्ण घरच वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला होता.

या महापूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नुकताच राज्य शासनाच्या वतीने अनुदान मंजूर झाल्याचा शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. त्यात चाळीसगाव मतदारसंघासाठी ६ कोटी ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे.

यामुळे दुष्काळाच्या गर्तेत असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील महापूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी राज्य शासनाचे व महापूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना मदत मिळवून देणारे चाळीसगाव मतदारसंघाचे संवेदनशील आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

प्रत्येक संकटात चाळीसगाव वासीयांच्या सोबत : आमदार मंगेश चव्हाण

ऑगस्ट २०२१ मध्ये मध्यरात्री झालेल्या महापुरामुळे मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यावेळी महापूरग्रस्त प्रत्येक गावाला भेट देऊन पंचनामे केले होते. तसेच ज्यांची घरे वाहून गेली होती त्यांना तात्पुरती घर देखील स्वखर्चाने उभारून दिली होती. गेल्या २ वर्षांपासून मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित होता. याबाबत माझ्या पाठपुराव्याला यश आले असून जीवितहानी, पशुधन हानी, घर, गोठा, संसारोपयोगी साहित्य अशी वित्तहानी झालेल्या महापूरग्रस्तांना ६ कोटी ३८ लाख निधी प्राप्त झाला आहे. लवकरच सदर मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

सदर मदत मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानतो. कोणत्याही संकटात मी चाळीसगाव वासीयांना एकटे सोडणार नाही, राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहील हा विश्वास यानिमित्ताने देतो, असेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

दुर्दैवी घटना : वाघले कोंगानगर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू

June 16, 2025
चाळीसगाव

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

June 14, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

June 12, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
चाळीसगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे बनावट जॉईनिंग लेटर देऊन तरुणीची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2025
चाळीसगाव

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
Next Post

आजच्या काळात रोजगाराभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रमच उपयुक्त : प्रा. एम.बी.पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार !

July 31, 2024

शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप

November 27, 2020

चाकूच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटणारे दोघे अटकेत ; एलसीबीची कारवाई

November 26, 2020

यावलच्या कानतोडी शिवारात पट्टेदार वाघ दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

December 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group