चोपडा (प्रतिनिधी) येथील ऑनर किलिंगच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. खून केल्यानंतर संशयित आरोपींनी कायदेशीर मार्गदर्शनाने पुरावे नष्ट केल्याची जोरदार चर्चा आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी आरोपी केलेले नसतानाही गावातील एका प्रतिष्ठीत वकीलाने अटकपूर्व जामीनसाठी कोर्टात धाव घेतल्याचेही कळतेय.
प्रेम प्रकरणाच्या संशयातून वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपूरा चोपडा) या दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांसह भरत संजय रायसिंग (वय २२ वर्ष रा. सुंदरगढी चोपडा ता. चोपडा), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय १९ वर्ष रा. पंकज स्टाफ चोपडा ता. चोपडा), रत्नाबाई समाधान कोळी (वय ३७ वर्ष रा. सुंदरगढ़ी चोपडा ता. चोपडा), मयुर काशीनाथ वाकडे (वय २३ वर्ष रा. गणपती मंदिराजवळ अरुण नगर चोपडा ता. चोपडा), शांताराम अभिमन कोळी (वय ५६ वर्ष रा. शिंदेवाडा चोपडा ता. चोपडा), आनंदा आत्माराम कोळी (वय ४५ वर्ष रा. माचला ता. चोपडा), पवन नवल माळी (वय २२ वर्ष रा. पाटीलगढी चोपडा ता. चोपडा), रविंद्र आनंदा माळी (वय २० वर्ष रा. माचला ता. चोपडा) अशा ११ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या ऑनर किलिंग प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. संशयित आरोपींनी कायदेशीर सल्ला घेऊन पुरावे नष्ट केल्याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे एका प्रतिष्ठीत वकिलाने आधीच अटकपूर्व जामीनसाठी कोर्टात धाव घेतल्याचे कळतेय. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे?, हे अद्याप समोर आलेले नाहीय. तर दुसरीकडे कुण्या वकीलाला आरोपी केले आहे का?, यावर पोलीस सूत्रांनी नकार दिलाय. परंतू त्याने अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होवून (उद्या)ची दि.१९ ऑगस्ट तारीख मिळाली असल्याचे कळते.