धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे दोन गटात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना दि. १८ रोजी ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण ६ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पहिली फिर्याद श्रीकांत दिलीप पाटील (समुदाय आरोग्य अधिकारी, बोरखेडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि. १८ रोजी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताताल दादरचा चारा चोरी गेल्याची विचारणा शेजारील शेती करणारे ज्ञानेश्वर उर्फ पंकज विश्वानाथ पाटील यांना विचारणा केली. याचा त्यांना राग आल्यामुळे त्यांनी तसेच त्यांच्या सोबतचे गजानन कैलास पाटील, आकाश रुपसिंग पाटील अशांनी दारुच्या नशेत अनाधिकारपणे घरात घुसून श्रीकांत पाटील आणि त्यांच्या वडील व काकांना तसेच घरातील महिलांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देत मारण्यासाठी अंगात धावुन आले. एवढेच नव्हे तर ज्ञानेश्वर उर्फ पंकज पाटील व आकाश पाटील यांनी झटापटीत श्रीकांत पाटील यांच्या हातातील ५० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेऊन गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राजू पाटील हे करीत आहेत.
तर दुसरी फिर्याद गजानन कैलास पाटील यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा शालक पंकज विश्वनाथ पाटील (रा. बोरखेडा ता. धरणगाव) याने गुरांचा चारा कापून आणल्याच्या संशयावरुन गावातील डॉक्टर श्रीकांत पाटील, त्याचे वडील दिलीप पाटील, त्याचे काका कांन्तीलाल पाटील (सर्व रा. बोरखेडा) यांनी मारहान करुन त्याच्या हातावर, छातीवर मारुन दुखापती केली आहे. तसेच गजानन पाटील हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता डॉक्टर श्रीकांत पाटील याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची १० ग्रॅम वजनाची चैन जबरीने तोडुन घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. दिपक पाटील हे करित आहेत.