मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
आंबेडकर म्हणाले की, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून येथील लोकांना दिलासा मिळेल. तसेच आपातकालीन व्यवस्थापनासोबत तातडीने बैठक घेऊन काय मदत करणार, हेदेखील जाहीर करा. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. याचा सर्वात मोठा तोटा शेतकऱ्यांना झाला. यासोबतच अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे साठवणूक केलेले अन्नधान्य भिजले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे आंबेडकर म्हणाले आहेत.