
जळगाव (प्रतिनिधी) – मागील भांडणाच्या कारणावरुन मुलीसोबत जात असलेल्या नयना सचिन चौधरी (वय ३०, रा. रेणुकानगर, मेहरुण) यांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. तसेच भाजी कापण्याच्या चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २६ रोजी सायंकाळी ६ वाजता ओक मंगल कार्यालयाच्या गल्लीत घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण परिसरातील रेणुका नगरात नयना चौधरी या वास्तव्यास आहे. दि. २६ रोजी त्या शनिपेठ परिसरात राहणाऱ्या ब्राह्मण यांच्याकड त्यांची मुलीची शांती पुजा करण्यासाठी कधी जायचे हे विचारण्यासाठी जात होत्या. त्यावेळी तायडे दाम्पत्याने महिलेला बघून त्यांना शिवीगाळ करण्यास सरुवात केली. त्यावर महिलेने शिवीगाळ का करत आहात असे विचारले असता संशयित दिनेश उर्फ गोविंदा तायडे याने त्याच्या हातातील काठीने महिलेच्या डोक्यावर वार करीत डोके फोडले. त्यानंतर पुजा उर्फ रुपाली तायडे या महिलेने भाजीपाला कापण्याच्या चाकूने महिलेवर वार करीत गंभीर जखमी करीत तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान, महिलेने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दि. २९ रोजी शनिपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित पुजा उर्फ रुपाली दिनेश उर्फ गोविंदा तायडे, दिनेश उर्फ गोविंदा राजाराम तायडे (दोघ रा. मोहन टॉकीज जवळ, जैनाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ अजय निकम हे करीत आहे.
















