TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देखते है किसमे कितना है दम ; भाई जगताप यांचा स्वबळाचा नारा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आम्हाला तिसरा पक्ष म्हणतात अशी खंत व्यक्त करत आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. आम्हाला स्वबळावर लढू द्या असा आग्रह भाई जगताप यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता भाई जगतापांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकारमध्ये सारंकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जातं. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेसमधून वेगळा स्वबळाचा सूर लावला जात आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच स्पष्ट केलं असताना आता मुंबईत देखील काँग्रेसने स्वबळाचा सूर लावला आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना स्वबळावर लढू देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. त्यामुळे काँग्रेसनं राज्यातील सत्ताकाळाला ५ वर्ष पूर्ण होण्याआधीच पूर्ण फारकतीचे इशारे दिल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचंच दिसून येत आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

भाई जगताप यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एकटं लढू देण्याची परवानगी पक्षश्रेष्ठींना मागितली आहे. “काल-परवापर्यंत काँग्रेसचा कॉग्निझन्स लोक घेत नव्हते. आज फक्त काँग्रेस काय करतेय हे बघत आहेत. मग ते मुंबई असो वा महाराष्ट्र असो. माझी तुमच्याकडे विनंती आहे. राहुल गांधींना विनंती आहे. सोनिया गांधींना विनंती आहे. आम्हाला एकटं (स्वबळावर) लढू द्या. तेव्हा बघुयात किस मे है कितना दम”, असं भाई जगताप म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याविषयी घेतली जाणारी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अवघ्या वर्षभरावर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. करोनाची परिस्थिती सामान्य असली, तर मुंबई पालिकेच्या निवडणुका होतील, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात सत्ता हातची गेल्यानंतर भाजपाकडून मुंबई महानगर पालिकेसाठी पूर्ण जोर लावला जाऊ शकतो. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसेनेला भाजपासोबतच काँग्रेसचाही निवडणुकीत सामना करावा लागतोय की काय? अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला ८२ तर शिवसेनेला एक जागा जास्त म्हणजे ८३ जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यंदा शिवसेनेसमोर भाजपाचं कडवं आव्हान असणार आहे. त्यातच राज्यातील मित्रपक्ष काँग्रेसने स्वबळाचा सूर आळवायला सुरुवात केल्यामुळे शिवसेनेसाठी मुंबई महानगर पालिकेचा पेपर दिवसेंदिवस कठीण होताना दिसत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

घोटाळा 'अंतिम' नाहीच ; मुद्रांक, इंधन स्कॅमनंतर 'बीएचआर'मुळे 'तोतला' पुन्हा चर्चेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात चौघांनी धुमस्टाईल लांबवली पैशांची बॅग !

January 8, 2024

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025

भोसरी भूखंड प्रकरण : … हे तर राजकीय षडयंत्र ; खडसेंचा भाजपवर हल्लाबोल !

July 8, 2021

बारामतीतल्या ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

January 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group