जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये कलावंत विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यशास्त्र विभाग असणे आवश्यक आहे. परंतु, येत्या शैक्षणिक वर्षात कबचौ विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावा, व यासाठीची तरतूद करून कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर सचिव अँड. कुणाल पवार यांनी प्रभारी कुलगुरू यांना केली आहे.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधील भावी कलावंत विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यशास्त्र विभाग असणे आवश्यक आहे. परंतु, तसे आज पर्यंत जाले नाही. नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्याबाबत कलावंतांनी बऱ्याच वेळा तत्कालीन कुलगुरूंची भेट घेऊन पाठपुरावा केला. अर्ज सुद्धा करण्यात आले, पण कुलगुरूंनी निधीचे कारण पुढे करून नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात येऊ शकत नाही, असे सांगून त्याबाबत असमर्थता दाखवली होती. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात व पूर्ण खानदेशात विद्यार्थी पदवीधर आहे. त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, पण विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएट नाट्य विभाग नसल्याने विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करता येत नाही, पर्यायाने नवीन कलावंत आपल्या विद्यापीठमध्ये तयार होत नाही, तरी विद्यार्थ्यांची मागणी आहे की, येत्या शैक्षणिक वर्षात कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावा, व यासाठीची तरतूद करून कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर सचिव अँड. कुणाल पवार यांनी प्रभारी कुलगुरू यांना केली आहे.