धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका समारंभात केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ आज धरणगाव युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी युवासैनिकांसह राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत उपस्थित नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध नोंदवला.
महाराष्ट्राचे राज्यपाल हे संविधानीक पद असून राज्यपाल भगतसिंग कोशारी वारंवार या पदाची प्रतिष्ठा घालवीत आहेत. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असून १०६ हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. मागील काळात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत देखील असेच बेताल वक्तव्य करून मराठी माणसाच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या. आता पुन्हा देशाच्या आर्थिक राजधानीत मराठी, गुजराती, राजस्थानी असा प्रांतभेद निर्माण करून देशाच्या सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा बेजबाबदार व्यक्तीस महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी विचारांच्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
आपल्या कारवाईचा एखादा राजकीय पक्ष, आणि विशिष्ट विचारसरणीची संघटना आपल्या फायद्यासाठी वापर करत असेल किंवा आपण ते जाणून बुजून करु देत असाल . तर आपण आपल्या पेशाप्रती, देशाप्रती आणि संविधानाप्रती निष्ठापूर्वक , प्रामाणिकपणे, निरपेक्ष भावनेने काम करत आहात का? अशी शंका १३० कोटी भारतीयांच्या मनात येते आहे. आपल्या सर्व कारवाया भाजपा सोडून इतर पक्षांतील लोकांवरच कशा? आपण जाणून बुजून भारतीय जनता पक्षाला फेव्हर करीत आहात का ? इतर राजकीय नेत्यांवरील ईडीच्या कारवाया ते नेते भाजपा पक्षात प्रवेश करताच बंद कशा होतात? हे जनतेला समजत नाही? भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी आपण त्यांचे मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचा जनमानसात समज दृढ झाला आहे ?
३००० हजार कोटी रुपये किंवा त्याहून जास्त रूपये खर्च करून महाराष्ट्र सरकार पाडले जात आहे. अशी सर्व भारतभर बोंब होत आहे. याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहात. या घटनेवर किंवा त्यातील भ्रष्टाचारावर आपण कोणतीही कारवाई करत नाही. यावरून आपण संविधानाला धरून प्रामाणिकपणे व निरपेक्षपणे काम करत नाही हे स्पष्ट दिसून येते आहे.
आपले अधिकारी वर्ग आणि आपले कार्यालय कोणाच्यातरी दबावाखाली येऊन तर काम करत नाही ना ? अशी चर्चा ही जनमानसात होते आहे. जर आपण खरेच प्रामाणिक आहात तर आपली कारवाई सर्व पक्षांतील भ्रष्ट लोकांवर समान पातळीवर होणे आवश्यक आहे. पण तसे होताना भारतीय जनतेला कोठेही व कधीही दिसलेले नाही.
आपण विशिष्ट पक्षाला आणि विशिष्ट संघटनेला फेव्हर करून आपल्या कार्यालयाचा आणि पदाचा वापर करत असून यासाठी आपले अधिकारी वर्ग आणि आपले कार्यालय दोषी आहे.असा समज सर्व भारतीय जनमानसात पसरत आहे. हे नक्की. आपण जर भ्रष्टाचारावर कारवाई बाबत प्रामाणिक असाल तर आपल्या वर असे आरोप सतत व सर्व स्तरातून वारंवार का होत आहेत.?
ईडी कार्यालय आणि त्यातील अधिकारी भारतातील सर्व पक्षीय व क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न करीत आहेत? यांचे स्पष्टीकरण आपण जनतेला देणे आवश्यक आहे ? अन्यथा आपल्या वर व आपल्या कोणत्याही कारवाई वर यापुढे जनता विश्वास ठेवणार नाही याउलट आपण कोणालातरी फेव्हर करीत आहात. आपल्या कारवाईचा दृष्टीकोन हा पक्षपाती असून तो प्रामाणिक नाही असा समज जास्त बळावेल. आपल्या प्रती व आपल्या कामाप्रती जनमानसात जो अविश्वास निर्माण होत आहे हे योग्य आहे का ? हे आपण ठरवावे ?
दुसऱ्या च्या संपत्ती बाबतीत चौकश्या करणारे व कारवाई करणारे आपले अधिकारी वर्ग आणि आपले कार्यालय त्यांनी देखील आपल्या सर्व कुटुंबियांच्या संपत्तीचे विवरणही सर्व भारतीय जनतेला दिले पाहिजे. जर आपल्यातीलच काही अधिकारी हे भ्रष्टाचारी असतील तर आपल्याला दुसऱ्या वर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार उरतो का? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे? तसेच एखाद्या पक्षाला आणि विशिष्ट विचारसरणी असलेल्या संघटनेला आपले अधिकारी वर्ग त्यांच्या अधिकाराचा वापर करून साथ देत असतील तर हा देखील प्रशासकीय पातळीवर केलेला वैचारिक भ्रष्टाचारच आहे कि नाही हे आपण स्पष्ट करावे.हे आपण ठरवावे ? आंदोलनाद्वारे करीत असल्याचे गुलाबराव वाघ यांनी सांगितले.
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक अँड.शरद माळी, उप तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मा. उपनगराध्यक्ष देवादास महाजन, धनगर समाजाचे अध्यक्ष किशोर बापू कंखरे, नगरसेवक वासुदेव चौधरी, माजी जि.प. उपाध्यक्ष जानकिराम पाटील, मा सभापती दीपक सोनवणे, प्रेमराज पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन , भागवत चौधरी, अहमद खान पठाण, जितेंद्र धनगर, मा. किरण मराठे, मा.उप प्रमुख कृपाराम महाजन, शिवसेना तालुका संघटक धीरेंद्र पुरभे, उप शहर प्रमुख किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, भरत महाजन, विभाग प्रमुख गजानन महाजन, नागाबापू महाजन, युवा सेना उपशहर प्रमुख कमलेश बोरसे, पप्पू कंखरे, दिपक पाटील, छोटू चौधरी, शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष शहर नदीम काझी, लक्ष्मण महाजन, विजय महाजन,राजू चौधरी, छोटू जाधव, परमेश्वर महाजन, हेमंत महाजन, राहुल रोकडे, महेंद्र चौधरी, विलास पवार, छोटू जाधव, नागराज पाटील, सुदर्शन भागवत, भगवान महाजन, सुभाष महाजन, चेतन जाधव, पप्पू सोनार, सचिन चव्हाण, आयास सिद्दिकी, सद्दाम आली, गौरव महाजन, दाडीबापू चौधरी, समाधान महाजन, आपु महाजन, रामकृष्ण महाजन, अरविंद चौधरी, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे, मीडिया प्रमुख जयेश महाजन, मीडिया तालुका प्रमुख केतन ठाकरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.