TheClearNews.Com
Sunday, June 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : अखेर मुसद्द्यांची सरशी…नवख्यांची माघार…!

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2021
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीतून भाजपची माघार ही सक्षम नेतृत्वाचा अभाव दर्शवणारी आहे. भाजपचे नेतृत्व करणाऱ्यांनीच स्वतः माघारीची घोषणा करून या संस्थेच्या निवडणुकीत परिणामकारक नेतृत्व करण्याची क्षमता नसल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केल्यासारखे आहे. तसेही ही निवडणूक काही नगरपालिका किंवा ग्रामपंचायतची निवडणूक नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यास वेगवेगळी आमिषे, किंवा दबाव अथवा थेट आत टाकण्याची भीती (संदर्भ : जळगाव मनपा निवडणूक २०१९) दाखवून भूमिकाच बदलण्यासाठी मजबूर केले जाते. तशी कोणतीही सोय, पर्याय या संस्थेच्या निवडणुकीत शक्यतो नसतो. जेडीसीसीच्या निवडणुकीसाठी आधीपासूनच नियोजन करावे लागते, शिवाय या संस्थेत पक्षीय अभिनिवेशाला फारसे महत्वही नसते. तरी देखील या संस्थेची जेंव्हा निवडणूक जाहीर झाली, तेव्हा सुरवातीला स्वबळाची भाषाही काहींनी वापरली, पण ती लवकरच हवेत विरली. त्यानंतर सर्वपक्षीय आघाडीचा खेळ सुरू झाला. तो ही एकमेकांवर कुरघोड्या, अविश्वास दाखवत सर्वपक्षीय आघाडीचा खेळही सुरू होण्यापूर्वीच आटोपला. यातील खरी लक्षणीय बाब म्हणजे सहकार क्षेत्रातील बारकावे, मुसद्दीपणा फार थोड्या जणांकडे आहे, त्यातही भाजपचे नेतृव करणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात ही गुणवैशिष्ठे कुठे आहेत? माजी मंत्री गुलाबराव देवकर, चिमणराव आबा पाटील, ऍड. वसंतराव मोरे काका, सतीश अण्णा पाटील या नेते मंडळींचा राजकीय प्रवास मुळातच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सुरू झाला.त्यांचा गेल्या २५ ते ३० वर्षांचा अभ्यास आणि सरावही आहे. भाजपबद्दल बोलायचे झाल्यास भाजपचे तत्कालीन मंत्री व विद्यमान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे अथक राजकीय परिश्रम, डावपेच आणि प्रत्येक समाजाशी असलेली बांधिलकी त्यामुळे गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपचा लक्षवेधी प्रभाव या संस्थेत उमटविला होता, तसा प्रभाव भाजपच्या आताच्या नेतृत्वाकडे कुठे आहे? भाजपने केवळ स्व:तची आब राखली.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

मराठीत एक प्रचलित म्हण आहे, झाकली मूठ सव्वा लाखाची.. गिरीश महाजन यांनी ऐनवेळी माघारीची घोषणा करून स्व:तसह भाजपचीही अब राखली. कारण कोणते ही नियोजन नाही, तुल्यबळ उमेदवारांचा अभाव, अशा स्थितीत दारुण पराभवाची नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा युध्दातूनच पळ काढलेला बरा. खर तर महाजन ज्या भाजपचे नेतृत्व करीत आहेत, त्याचा इतिहास संघर्षाचा आणि सतत लढण्याचा राहिला आहे, संसदेत दोन खासदारांच्या माध्यमातून पक्ष उभा करण्याचा काळ आठवावा…! माघारी मागची जी कारणे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काल सांगितली गेली, ती फारच केविलवाणी आणि हास्यास्पद अशी होती. खर तर स्वत: श्री महाजन हे जामनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून सहज निवडले गेले असते, प्राप्त माहितीनुसार 92 मतदार संस्था पैकी 60 पेक्षा जास्त संस्था त्यांच्या बाजू ने आहेत ,असे असताना त्यांनी माघार घेणे हे एक कोडेच आहे.

गैरकारभार बाहेर काढाच …..!

जेडीसीसीमध्ये गेल्या पाच वर्षांच्या काळात मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप वजा दावा श्री महाजन यांनी केल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी छापले आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याने आता ते निवांत झाले आहेत, थोडक्यात टेन्शन फ्री आहेत. त्यामुळे त्यांनी आपली विधायक शक्ती गैरकारभार उखडून काढण्यासाठी जरूर खर्च करावी. त्यांच्या या खोदकामाचे तमाम शेतकरीच काय जिल्ह्यातील जनताही स्वागत करेल. पण ही उठाठेव करण्यापूर्वी त्यांनी गेल्या पाच वर्षात या संस्थेसाठी काय केले. तसेच ते कोणते संचालक होते, ज्यांनी आपल्या मर्जीतील संस्थाना कोट्यवधींचे कर्ज वाटले अथवा मंजूर करण्यास भाग पाडले, त्यांची नावे जाहीर करावीत. आणि हो त्या सोबतच आपण गेली पाच वर्षे संचालक पद भूषवित होता, तेव्हा ही अनागोंदी रोखण्यासाठी कोणते प्रयत्न केले, संस्थेच्या किती सभांना आपण हजर होता, अश्या कोणत्या ठरावांना तुम्ही विरोध केला, ते सभेच्या प्रोसेडिंगमध्ये नमूद असेलच…! तूर्त एवढेच…

सुरेश उज्जैनवाल
पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

वानखेडे कुटुंब राज्यपालांच्या भेटीला, राज्यपालांची भेट सकारात्मक झाली : क्रांती रेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावीर पतपेढीच्या संचालकांसह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

March 7, 2024

जलआक्रोश मोर्चा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी होता की पाण्याचे राजकारण करण्यासाठी होता? ; शिवसेनेचा सवाल

May 24, 2022

जय महाराष्ट्र..! एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट ; शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार ?

June 21, 2022

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत; राजू शेट्टी यांनी घराबाहेरच केली कृषी विधेयकांची होळी

December 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group