TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रत्येक शिक्षक हा आदर्श : पालकमंत्री गुलाबराव पाटील

सामाजिक भान जोपासणारा विद्यार्थी घडवायला हवा : प्रा. गणेश शिंदे !

vijay waghmare by vijay waghmare
August 31, 2024
in धरणगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) शिक्षक होणे हा व्यवसाय नसून तो एक प्रामाणिक पेशा आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच त्यांच्यातील समाजभान जागृत करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करायला हवे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होईल. हे करत असताना शिक्षकांनी स्वाभिमानी पिढी निर्माण होण्यासाठी संस्कारांचे बिजारोपणही करायला हवे. असे आवाहन व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले. पाळधी ता. धरणगाव येथील गुलाबरावजी पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.

आपल्या व्याख्यानात शिक्षकांशी संवाद साधताना प्रा. गणेश शिंदे म्हणाले की, आपण नोकरी करत असताना पैसा तर कमवतोच. परंतु आपले जगणे सुंदर करण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. निसर्गाशी जुळवून घेता आला पाहिजे. त्यासाठी झाडे लावण्यासह ते जगवण्याची जबाबदारी सुद्धा आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. शिक्षकाचा सर्वात मोठा दागिना म्हणजे ज्ञान आणि सोबतच नम्रपणा होय. यासोबतच आपल्याला काळासोबत टिकून राहायचे असेल तर बदल स्वीकारावा लागेल. आधुनिक जगाबरोबर वाटचाल करताना परिवर्तन स्वीकारून आपल्यात बदल करायला हवे. शिक्षक हा माणूसपण जागवणारा पेशा असून मुलांचा किंबहुना समाजाचा शिक्षकांवर प्रचंड विश्वास असतो. त्यामुळे प्रामाणिक नागरिक घडवण्यासाठी काम करा. आपल्या कामातून आणि ज्ञानातून आपली हवा झाली पाहिजे. स्वाभिमानी पिढी निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष वृत्ती तयार करा, असे आवाहन देखील त्यांनी शिक्षकांना केले.

READ ALSO

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

प्रत्येक शिक्षक हा आदर्श – पालकमंत्री गुलाबराव पाटील
प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी त्यांना शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करत आहोत. आम्ही जे बोलतो तशीच कृती करत असतो. आज गुरुजनांच्या आशीर्वादाने समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे. आयुष्यात अनेक वळणे येत असतात. मी आयुष्यात गुलाब गुरुजी सुद्धा झालो असतो. परंतु समाजकारणातून राजकारण करत आज राज्याची सेवा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी शिक्षकांचे मला सातत्याने मार्गदर्शन लाभत आले आहे. फक्त पुरस्कार मिळवणारा हा शिक्षक आदर्श नसतो तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श असतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक तथा जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी ‘शिक्षक सन्मान सोहळा’ बाबतचे महत्त्व विशद करून गुरुजनाविषयी आदर व्यक्त केला. सूत्रसंचालन प्राध्यापक भूषण पाटील यांनी केले तर नाना पाटील सर यांनी मानले.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गट शिक्षणाधिकारी सौ.भावना भोसले, सौ. सरला पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील, विविध शिक्षक संघटनेचे राधेश्याम पाटील, ग स चे ज्ञानेश्वर सोनवणे, नरेंद्र सपकाळे, मनोज माळी, जे के पाटील, धनराज मनोरे, नाना पाटील, शरद पाटील, श्रीपाद पाटील, सौ शितल सोनार, राजेंद्र डॉ. मिलिंद बागुल डॉ. विजय बागुल, नरेंद्र सपकाळे , कैलास वाघ, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अरविंद मानकरी, कैलास पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षिका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
Next Post

चाळीसगाव शहरातील विविध प्रभागातील रस्ते, खुली जागा विकसित, सभामंडप व पथदिवे आदी कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बुध्दिबळ खेळात जीवन जगण्याची कला – माजी आमदार सौ. मधुभाभी जैन !

July 25, 2024

आदर्श आचारसंहिता लागू होताच धरणगावातील राजकीय बॅनर काढण्याचे काम सुरु !

July 10, 2022

चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

October 28, 2020

जळगाव मनपा समोर मनसेचे ‘झोपा काढा’ आंदोलन !

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group