चाळीसगाव (प्रतिनिधी) – कोदगाव येथे घरासमोरील गतीरोधक तोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यास काठीने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कोदगाव येथील शेतकरी नीलेश सीताराम पाटील (वय ३७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नीलेश पाटील यांच्या घरासमोर ग्रामपंचायतीने वाहनांचा – वेग नियंत्रित करण्यासाठी गतीरोधक तयार केला होता. दरम्यान, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच नळाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने घरासमोर चिखल साचत होता. त्यामुळे ३० मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पाणी वाहून जाण्यासाठी त्यांनी गतीरोधकाचा काही भाग तोडून निचऱ्याची व्यवस्था केली. याच कारणावरून गावातील दीपक बाळू पाटील व अनिल बाळू पाटील हे दोघे त्यांच्या घरासमोर आले.
गतीरोधक का तोडला, असा जाब विचारत दोघांनी वाद घातला. या वेळी अनिल पाटील याने शिवीगाळ केली तर दीपक पाटील याने काठीने मारहाण केली. तसेच दोघांनी ठार मारण्याची धमक दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. जखमी नीलेश पाटील यांन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी दीपक पाटील व अनिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















