मुंबई (वृत्तसंस्था) पहिलं तू सुधर म्हणा बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो’ अशा शद्बात गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे.
शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण सुरूच आहे. जर शिंदे गटाचे 50 आमदार निवडून आले तर मी हिमालयात जाईल असं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. खौरे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्ततर दिले आहे. ‘पहिलं तू सुधर म्हणा बाबा, एमआयएमने पाडून टाकलं, लोकांचं काय बघतो’ अशा शद्बात गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे.
तसेच त्यांनी यावेळी बोलताना शासनाचा नवा जीआर वंदे मातरम् वर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शासनाकडून नवा जीआर काढण्यात आला आहे. नव्या जीआरनुसार आता शासकीय कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यानंतर किंवा कोणाला फोन केल्यानंतर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे लागणार आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘वंदे मातरम् म्हणण काय वाईट आहे. तुम्ही ज्या मातीत राहातात तिला नमन करण म्हणजे वंदे मातरम् . इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् बोलना होगा’ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
या महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून २ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होत आहे. आनंदमठमध्ये हे गीत लिहीताना जन गन मन हे राष्ट्र गीत आणि वंदे मातरमला मान्यता देण्यात आली. इंग्रजांना हे गीत त्रास देणारे वाटायचे. हे शब्द आम्हाला प्राण प्रिय आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. संभाषणाची सुरुवात हॅलोने झाली. ती वंदे मातरमने व्हावी, मग ती मोबाईलवर असो की दोघांमधील चर्चा, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच हे अभियान आहे, सक्ती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.