धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मराठी गल्ली बजरंग चौक परिसरात सालाबादाप्रमाणे आखाजीच्या आठ दिवसापासून पत्ते खेळले जात असतात. मात्र या वर्षी स्थानिक रहिवाशांनी त्याला विरोध केला असून धरणगाव पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक राहुल खताळे यांना निवेदन दिले. तसेच ते बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
जुगारमुळे परीसरात भांडण-तंटे होतात. रहीवासी यांना त्रास होतो. नागरिक या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत भांडण करत असतात. त्यामुळे यावर्षी जुगार बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. बंजरग चौक येथे बंदोबस्त लावुन पत्ते खेळणाऱ्यावर कारवाई करुन केसेस दाखल करु असे आश्वासन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिले आहे. निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते गुलाब मराठे, निलेश महाले, राहुल रोकडे, दिपक चौधरी, दादु चौधरी, राहुल मराठे यांच्यासह आदी उपस्थित होते.