जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या रंजिता राहूल सोनार (वय २४) या तरूणीला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावेळी रूग्णालयात तरूणीच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.
रंजिता सोनार ही तरूणी आपल्या कुटुंबासह हरिविठ्ठल नगरात सोमाणी गल्लीत वास्तव्याला होती. गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी घरी काम करत असतांना तिला इलेक्ट्रीक शॉक लागल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले हे करीत आहे.