धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात असलेले शासकीय भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
गेल्या २१ तारखेपर्यंत शासकीय नाव नोंदणी झालेली असून त्यात सुमारे २ हजार शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीसाठी नाव नोंदणी केलेली असून तरीदेखील शासकीय भरडधान्य खरेदी अद्ययावत सुरू झालेले नाही. नाव नोंदणी मार्केट कमिटी सुरु करण्यात आले होते. परंतु २१ एप्रिलपर्यंत मुदत असून ती आता बंद झालेली आहे. त्याचप्रमाणे शासकीय भरडधान्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या घरात धान्य खराब होण्याच्या वाटेवर आहे. मका गहू ज्वारी बाजरी हे धान्य खरेदी केले जात असतात. यांची मुदत १ मे तारीख असून आजची ४ मे तारीख आलेली आहे. तरी देखील शासकीय खरेदी सुरू झालेले नाही. ते लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.
नाव नोंदणी करून १५ दिवस झाले असून तरी देखील सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत.
जेणेकरून पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर भरडधान्य खरेदी केल्यास शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. शासकीय खरेदी लवकरात लवकर करावी अन्यथा शेतकरी कृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी कृती समिती तालुका समन्वयक गोपाल पाटील यांनी केली आहे.