जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज सायंकाळी ७.३० आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून मुलाखत प्रसारीत होणार आहे.
‘हर घर जल’ अर्थात प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे नियोजन याविषयावर पालकमंत्री पाटील हे सविस्तर माहिती देणार आहेत. नागरिकांनी ही मुलाखत जरुर ऐकावी. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सतीश पप्पू यांनी ही मुलाखत घेतली आहे.