पुणे (वृत्तसंस्था) कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला. यात २ वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर २० हून अधिक वारकरी जखमी झालेत. हि घटना वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत घडली. यानंतर पिकअप चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे. तर जवळपास २० पेक्षा अधिक जखमी झाले झाल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त छोट्या ट्रॅक्टरला जोडलेल्या पालखीसह वारकऱ्यांची दिंडी पायीच आळंदीकडे चालली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी खालापूर तालुक्यातील उंबरे गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला पिकअपने जोराची धडक दिली. यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. सहा रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमी वारकऱ्यांना जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी २ वारकऱ्यांचा मृत्यू झाला.