मुंबई (वृत्तसंस्था) महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला त्यानिमित्त आज 95 वा चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला. यावेळी रेजिमेंटच्या माजी अधिकाऱ्यांनी व जवानांनी महाड येथे “रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही” अशी तक्रार केल्याचे गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत त्यांच्या सोशल मिडियावर जवानांसोबतचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, “महार रेजिमेंट ही भारतीय सैन्य दलातील एक प्रमुख रेजिमेंट आहे. त्याच्या स्थापनेच श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज त्या रेजिमेंटच्या माजी अधिकाऱ्यांची व जवानांची महाड येथे भेट घेतली”. आव्हड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्या माजी जवानांशी चर्चा करत असताना,”आता रेजिमेंटमध्ये आम्हाला जयभीम म्हणता येत नाही,”अशी तक्रार त्यांनी केली. यावर पुढे आव्हाड म्हणाले की, “जयभीम ही एक क्रांतिकारी ऊर्जा देणारी घोषणा आहे. त्याच्यावर बंदी का आणली..? हा प्रश्न आम्ही भारतीय लष्कराचे प्रमुख व संरक्षण मंत्र्यांना विचारणार आहोत.” असे देखील त्यांनी सांगितले.
आज चवदार तळे सत्याग्रहाला 95 वर्ष पुर्ण झाले असून हा दिवस महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला होता. त्यानंतर हा दिवस ‘समता दिन’ तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, हा दिवस समाजातील बऱ्याच घटकांसाठी ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे.