TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रधानमंत्री आवास योजनेतील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासह मानधन वाढवा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजनेतील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासह मानधन वाढवण्यासाठी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वकाक्षी असणारी “प्रधानमंत्री आवास योजना” या शहरी व ग्रामीण भागातील सर्वासाठी घरे या योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद स्तरावर शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील सिव्हिल इंजिनिअर, समाज विकास तज्ञ, एम आय एस स्पेशालिस्ट ही पदे मानधन तत्वावर शासनाकडून भरण्यात आलेली आहेत. या पदावर उच्चशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी शासनस्तरावर करण्यात येत आहे. तसेच या योजनेच्या सुरुवातीपासून ते आज पाच ते सात वर्षापेक्षा जास्त कलावधी पुर्ण होऊनही या कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे मानधनात ५० टक्के वाढ करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे या ही कर्मचाऱ्यांना एच.आर.पॉलिसी लागू करावी यासह विविध सुविधा मिळण्याचीही मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुर्ण व्हाव्यात या साठी जळगाव जिल्हातील सीएलटीसी कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनेमार्फत दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी यांना आपल्या वरील मागण्याचे निवेदन देण्यात आले. याबाबत लवकरात लवकर शासस्तरावरून कार्यवाही करू असे आश्वासन मा. जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व अभियंत्यांना दिले आहे..

READ ALSO

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

केंद्र व राज्य सरकारने “ सर्वांसाठी घरे” या प्रधानमंत्री महोदयांच्या महत्वकांक्षेने मागील पाच वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या आवास (शहरी) योजनेतील कर्मचाऱ्यांनी कोरोनो काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता इतर कायम कर्मचाऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. याचीही दखल घ्यावी. तसेच नियमितपणे सदर कक्षामार्फत बेघर लोकांना घरे मंजूर करणेकरिता अर्ज स्वीकारणे, अर्जाची छाननी करुन शासनाकडे प्रस्ताव सादर करणे, पाठपुरावा करने, जिओ टॅगिंग करणे, अनुदान वितरणाची कार्यवाही पर पाडणेसह इत्यादी अनुषंगिक तांत्रिक कामे केली जातात. या कक्षात मागील पाच ते सहा वर्षांपासून कर्मचारी आवास योजनेचे काम करीत असून त्यांनी जळगाव जिल्ह्यात योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागील पाच वर्षात एकदाही मानधनात वाढ झालेली नाही. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे एच.आर.पॉलिसी सुद्धा लागू करण्यात आलेली नाही. यामुळे समान न्याय मिळावा यासाठीअशा विविध प्रलंबित मागण्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका प्रशासनास सीएलटीसी अभियंता, समाज विकास तज्ञ इत्यादी कर्मचाऱ्याकडून संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र सीएलटीसी अभियंता संघटनेचे राज्यध्यक्ष श्री. विशाल वानखेडे, प्रदेशअध्यक्ष श्री. विठ्ठल पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. भूषण महाजन, उपाध्यक्ष विक्रांत चौधरी, विजेंद्र निकम,अजिंक्य शिंपी, जगदीश महाजन, ललित महाजन, वैभव पाटील, व सर्व सदस्य उपस्थित होते.

प्रमुख मागण्या खालील प्रमाणे !

अ) पाच वर्षात एकदाही मानधनात वाढ झालेली नसल्याने याचा विचार करून 50 टक्के मानधन वाढ करावी.
ब) तांत्रिक कक्षात काम करणाऱ्या सर्व अभियंते, समाज विकास तज्ञ आणि एम. आय. एस. स्पेशालिस्ट यांना शासन सेवेत समावेशन करून घ्यावे.
क) इतर कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे या प्रधानमंत्री आवास योजना योजनेतील कर्मचाऱ्यांना एच.आर.पॉलिसी लागू करावी.
ड) राज्यस्तरावरून घेण्यात येणाऱ्या सर्व शासकीय भरतीमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात.
इ) सर्व कर्मचारी यांचा अनुभव व वय याचा विचार करुन जॉब सेक्युरिटी बाबत विचार व्हावा व वयाच्या 58 वर्ष पर्यंत नोकरीची हमी मिळावी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

June 25, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

June 25, 2026
जळगाव

रोहित निकम महाराष्ट्र पणन महासंघाचे नवे अध्यक्ष; राहुल काकडे उपाध्यक्षपदी

June 25, 2026
गुन्हे

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

June 25, 2026
क्रीडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
Next Post

उभ्या कंटेनरवर कार धडकली ; तिघे जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2025 !

September 4, 2025

रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छ रेल पंधरवडा

September 21, 2020

धरणगावात राजकीय खळबळ ; माजी नगरसेवक वासू चौधरींसह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात !

October 2, 2022

Today’s Horoscope आजचे सविस्तर राशीभविष्य 11 एप्रिल 2025

April 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group