TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे बिल न मिळाल्यामुळे आयुष्य बरबाद होण्याच्या मार्गावर : निलेश वर्मा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे बिल न मिळाल्यामुळे आयुष्य बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याची व्यथा डिजिटल मार्केटिंग व्यावसायिक निलेश वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत मांडली.

निलेश वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 27 जून रोजी जळगाव शहरात ‘शासन आपल्या दारी’ हा राज्य शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी फोन करून ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या प्रचार, प्रसार कामी व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिरात म्हणून प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तसेच व्हाट्सअपच्या माध्यमातून देखील सूचना दिल्या होत्या.

READ ALSO

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार कार्यक्रमासाठी 18 तासांपेक्षा कमी वेळ असताना सुद्धा आम्ही दिवस-रात्र मेहनत करून व्हिडिओची निर्मिती केली आणि त्यास वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांना जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवले तसेच संबंधित माध्यमांना त्या जाहिरातीचे शुल्क देखील तात्काळ स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने अदा केले. व्हिडिओ निर्मितीनंतर माध्यमांना पाठवत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल सतत संपर्कात होते तसेच तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी यांनी रात्री साडेअकरा वाजता सुद्धा कॉल करून आणि मेसेजद्वारे न्यूज पोर्टल आणि माध्यम प्रतिनिधींची नावे सुचवत जाहिराती पाठवण्याच्या सूचना दिल्या.

कार्यक्रम झाल्यावर आम्हाला बिल जमा करण्यास सांगण्यात आले त्यानुसार आम्ही रीतसर बिल जमा केले. मात्र, त्याच दरम्यान अमन मित्तल यांची बदली झाली. नवीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाहीत. तसेच कार्यक्रम माझ्या कार्यकाळात झालेला नसल्याने व अमन मित्तल यांनी प्रशासकीय मान्यता न घेता आदेश दिलेले असल्याने बिल कधी मिळतील सांगता येत नाही, असे उत्तर दिले. यासंबंधी मी मुख्यमंत्री कार्यालयास मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आपली तक्रार रेवेन्यू डिपार्टमेंटला फॉरवर्ड करण्यात असल्याचे उत्तर मिळाले. पण कारवाई शून्य झाली. मंत्री गिरीशभाऊ यांना फोन केला पण उत्तर मिळाले नाही. आमदार राजूमामा भोळे यांना प्रत्यक्ष भेटलो पण फक्त आश्वासन मिळाले. परंतु कोठेही मदत मिळाली नाही. त्यानंतर लोकमत मधील प्रसिद्ध झालेल्या बातमीमधून आयुष प्रसाद यांनी आमच्या बिलांचा प्रस्ताव रोखला असून एका चौकशी समितीची स्थापना केल्याचे कळले.

चौकशी समितीमध्ये उपजिल्हाधिकारी तहसीलदार माहिती अधिकारी आदींचा समावेश होता. चौकशी समितीने आम्ही केलेल्या कामाचे पुरावे मागितले आणि सर्वांची चौकशी केल्यावर एक अहवाल दिला ज्यामध्ये आम्ही सर्व सेवा पुरवठा दरांनी कामे केलेली असून आम्हाला आमची बिल देण्यास हरकत नसल्याचे म्हटले होते. या अहवालानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हा माहिती कार्यालयास संबंधित कामांची तयारी अदा करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली. तसेच सर्व सेवा पुरवठादारांची कामे प्रमाणित करून देण्याबाबत आदेश दिल्याची माहिती आम्हाला मिळाली. जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी अहवाल देण्याआधीच मी तुमच्या कामाचा निगेटिव्ह रिमार्क देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार काही दिवसांनी मी बिलासंदर्भात माहिती घेण्यास गेलो असता मला सर्वांचे बिले पास झाले असून फक्त माझ्या बिलावर निगेटिव्ह रिमार्क असल्याचे असल्याने बिल मिळू शकणार नसल्याचे समजले.

ज्या चौकशी समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील होते. त्याच समितीने काम झालेली असून देयके देण्यास हरकत नसल्याचा अहवाल दिला आणि तेच जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील काम प्रमाणित करताना निगेटिव्ह मार्क देतात?, यामध्ये विसंगती आढळते. तसेच त्यांचा उद्देश स्वच्छ नसल्याचे जाणवते. माझे एक जून रोजी नवीन ऑफिसमध्ये स्थलांतरित झालं आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम या कार्यक्रमासाठी वापरली. मात्र, आठ महिने होऊन सुद्धा बिल मिळत नसल्याने कर्जावरील व्याज आणि पेनल्टी वाढली असून मी व्यावसायिक संकटात अडकलो आहे. ऑफिस खर्च, घर खर्च, बँकेचे हप्ते, मुलींचे शिक्षण, आईचे आजारपण इत्यादी समस्यांना तोंड देताना अनेक वेळा आयुष्याचा प्रवास संपवण्याचा विचार मनात येतो. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या आयोजनाचे सर्व नेते मंत्री आणि अधिकारी जबाबदार असून मला आयुष्यातून बरबाद होण्यापासून वाचवावे, असेही निलेश वर्मा यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

साळवे इंग्रजी विद्यालयात दहावी 2006 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘येड्याची जत्रा आणि खुळ्यांची चावडी’ ; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

September 11, 2021

बायकोला एका रात्रीसाठी पाठव ; बॉसची मागणी ऐकताच कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

April 12, 2022

बीएचआर घोटाळा : झंवर आणि कंडारे ३० दिवसात हजर न झाल्यास होणार फरार घोषित !

February 8, 2021

मी तुझ्या भावासारखा…चल तुला शाळेत सोडतो ; अल्पवयीन विद्यार्थिनीवर नराधमकडून अत्याचार !

October 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group