जळगाव (प्रतिनिधी) कालपर्यंत अनेक लोक खडसे संपले असे म्हणत होते. मात्र, त्याच नाथाभाऊंनी एकच प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्र हादरला. हे तर पहिलेच प्रकरण आहे, अजून कितीतरी प्रकरणे आहेत, अशा शब्दात वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी ‘बीएचआर’ घोटाळ्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे पुढे म्हणाले की, कालपर्यंत अनेक लोक एकनाथ खडसे संपले असे म्हणत होते. मात्र, आता नाथाभाऊंनी एकच प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्र हादरला. हे तर पहिलेच प्रकरण आहे, अजून कितीतरी प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात मोठी राजकीय गँग अडकली आहे. मात्र, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही जण नाही. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही. तसेच पवार साहेबांनी या नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर मला इतरांच्या मतांची गरज पडणार नाही, असेही खडसे म्हणाले.