मुंबई (वृत्तसंस्था) परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत शुक्लांवर आरोप केले आहेत. ‘रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदाराला महाविकास आघाडीत प्रवेश घेऊ नये यासाठी दबाव टाकला’, असा थेट आरोप केला आहे.
पोलीस दलात बदल्यांसाठी फोन टॅपिंग प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहे. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्यातील अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळात उमटले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिरोळचे आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजप बरोबर रहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यी भेट घेतली. त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला. असा गंभीर आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केला आहे.
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.