TheClearNews.Com
Thursday, January 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्राहक आणि शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे मोदींचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2020
in कृषी, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली प्रतिनिधी । आज बिहारमध्ये एका पुलासह १२ रेल्वे योजनांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विश्वकर्मा दिनाच्या मुहुर्तावर शेतीसंबंधीची तीन विधेयके लोकसभेत पारित झाली आहेत. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अधिकचे पर्याय उपलब्ध होतीत. ही विधेयके पारित झाल्याबद्दल मी देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. ही विधेयके शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दलालांपासून वाचवण्यासाठी आणण्यात आली आहेत. शेतीसंबंधीच्या या विधेयकांमुळे शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वत:चे पीक स्वत: विकून कमाई वाढवू शकेल, असे ही मोदी म्हणाले आहेत.

काही लोक अनेक दशके देशाच्या सत्तेत राहिले. त्यांनी देशावर राज्य केले. तेच लोक आज या विषयावरून शेतकऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना खोटेनाटे सांगत आहेत. निवडणुकांच्या वेळी हे लोक शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देत होते. आपल्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करत होते. मात्र निवडणुका झाल्यावर सर्व काही विसरत होते. आता त्याच गोष्ठींची पूर्तता एनडीएचे सरकार करत आहे. तर या मंडळींडून तऱ्हेतऱ्हेच्या अफवा पसरवत आहेत, असा आरोप मोदींनी केला. ज्या एपीएमसी कायद्यावरून हे लोक राजकारण करत आहेत. कृषी बाजारपेठेबाबतच्या तरतुदींमधील बदलांना विरोध करत आहेत. त्याच बदलांचे आश्वासन या मंडळींना आपल्या जाहीरनाम्यामधून दिले होते. मात्र आता एनडीएच्या सरकारने हे बदल केले तर यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिली जाणार नाही, शेतकऱ्यांकडून भात, गहू खरेदी केली जाणार नाही, असा दावा केला जात आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांना किमान हमीभावाच्या माध्यमातून योग्य मूल्य देण्यासाठी कटीबद्ध आहे, तसेच सरकारकडून खरेदी पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असे मोदींनी सांगितले.

READ ALSO

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

केंद्र सरकारने काल लोकसभेमध्ये पारित करून घेतलेल्या शेतीसंबंधीच्या तीन विधेयकांमुळे सध्या वातावरण तापले असून, या विधेयकांना तीव्र विरोध होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपाचा जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलानेही या विधेयकांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकांना विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. काही लोक दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला मोदींनी लगावला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

उर्मिला मातोंडकर एक अष्टपैलू अभिनेत्री -राम गोपाल वर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Marine Combat Veteran Kills 12 In Crowded California Bar

July 7, 2020

विवाहीतेचा छळ; पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

January 28, 2021

जिल्ह्यातील १० गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

September 13, 2021

केंद्रीय कृषीमंत्र्यांना धाडलं पत्र; समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group