धरणगाव (प्रतिनिधी) पालकत्व गमावलेल्या मुलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण करण्यासह तिच्या लग्नात देखील कुटुंबियांची भूमिका मुन्ना देवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशने नुकतीच निभावली. यामुळेच पालकत्व गमावलेल्या मुलीला दिला मायेचा ओलावा देणाऱ्या फाउंडेशनसह तिचे अध्यक्ष जीवनसिंह बयस यांच्या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.
येथील मुन्ना देवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी, गरजवंतांसाठी नेहमी अग्रेसर आहे. येथील दोन विद्यार्थिनींच्या पालकांचे सुमारे नऊ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. अशा वेळी संस्थेचे अध्यक्ष जीवनसिंह बयस यांनी या विद्यार्थिनीचे पालकत्व स्वीकारले. सदर विद्यार्थिनींचे पदवीपर्यंतचे शिक्षण संस्थेमार्फत केले. त्यातील एक विद्यार्थिनी स्वाती अरुण बयस हीचे नुकतेच लग्न ठरले. अशावेळी संस्थाध्यक्ष जीवनसिंह बयस यांनी सदर मुलीला लग्नप्रित्यर्थ सोनसाखळी भेट देऊन एक प्रकारे लग्नापर्यंतचे उत्तरदायित्व पालकत्व पार पाडले. यावेळी संस्थाध्यक्ष जीवनसिंह बयस, तेजेंद्रसिंह चंदेल, धीरेन्द्रसिंह पूरभे, गोविंद जनकवार, निलेश बयस, आदी पदाधिकारी उपस्थित होते. याबद्दल विविध मान्यवर व्यक्तींनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
मुन्ना देवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थेमार्फत अन्नछत्र सुद्धा गरिबांसाठी सुरू केले आहे. याशिवाय संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप. धरणगावातील प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थी दत्तक घेतले असून त्यांचा सर्व खर्च संस्था करते. धरणगाव परिसरातील धार्मिक कार्यात तसेच मंदिर जीर्णोद्धारसाठी सुद्धा संस्था मदत करते. सुमारे पन्नास निराधार व्यक्तींना घरपोच नियमित जेवणाचा डबा पोहोचविला जातो. संस्थेस ८०G आयकर विभागाकडून प्राप्त झाला असून देणगीदारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. तयमुले देणगीचा उपयोग सत्कारणी लागणार आहे.
















