लातूर (वृत्तसंस्था) घराशेजारी मोटारसायकल लावण्याच्या किरकोळ कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथे रविवारी (दि.२८) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तांड्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
एकंबी तांडा येथे रविवारी (दि.२८) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गावातील राजेंद्र गोपीनाथ राठोड यांच्या घराजवळ मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून अंकुश विनायक पवार (वय ३० रा. दत्तनगर, धाराशिव) आणि इतर सहा जणांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. सहा जणांनी मिळून मोटारसायकल लावणाऱ्या धाराशिव येथील अंकुश पवार यास लोखंडी रॉडने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला जबर दुखापत झाल्याने अंकुश पवार मृत्यू यांचा झाला. यामुळे सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. भोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी यांनी भेट दिली.
या प्रकरणी रामदास बाबुराव पवार (रा. 7 धाराशिव) यांच्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गु. र. नं. १००/२४ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, -५०४ भादंवीनुसार सहा आरोपींविरुध्द सोमवारी (दि.२९) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. पोळ हे करीत आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. त्यासाठी विविध पथके तयार करून विविध ठिकाणी पाठविण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे