जळगाव (प्रतिनिधी) मविप्रच्या वादातून अॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर ९ डिसेंबर २०२० रोजी फिर्याद दिली होती. याप्रकरणी आज सकाळी कोथरूड पोलिसांचे ७० लोकांचे पथक जळगावात येऊन धडकल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता कारवाई नेमकी ‘मविप्र’ संदर्भातच आहे का?, त्यावर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई सुरु आहे. कारवाई संपल्यानंतर संपूर्ण माहिती दिली जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
सहा पथकात ७० कर्मचारी अधिकारींचा समावेश
मविप्र’च्या वादातून अॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी सात पानांची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या ९ जणांवर ‘मकोका’ लावण्यात आलेला आहे. दरम्यान, आज पहाटे कोथरूड पोलिसांचे ७० कर्मचारी, अधिकारींचे पथक जळगावात धडकल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांचे पथक सहा मुख्य संशयितांच्या घरी पोहचले आहे. पथक या पाचही जणांच्या घरी झाडाझडती घेणार असून ‘मविप्र’ या संस्थेशी संबंधित कागदपत्र, संगणक वैगरे महत्वपूर्ण पुरावे ताब्यात घेणार असल्याचे कळते.
जाणून घ्या…’मकोका’ मंजुरी आदेशात नेमकं काय म्हटलं होते?
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथक प्रमुख तथा पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांनी सादर केलेला दि. ३० ओक्टोंबर २१ तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांच्याकडील गोपनीय अहवाल अन्वये आरोपी नामे १) तानाजी केशव भोईटे, रा. ए-१/ए. १००१. माणिकचंद मलबार, कोंढवा पुणे २) विरेंद्र रमेश भोईटे, रा. भोईटेनगर, जळगाव, ३) जयंत फकीरराव देशमुख, रा. हत्ती बिल्डींग, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ४) जयवंत पांडुरंग येवले, रा. शिवाजीनगर ता. यावल, जि. जळगाव ५) भगवंतराव जगतराव देशमुख, रा. वरणगाव. ता. भुसावळ, जि.जळगाव, ६) गोकुळ पितांबर पाटील, रा. भादली, पो. कठोरा, ता. जि. जळगाव, ७) बाळू गुलाबराव शिके, रा. बोरायल गेट ता. यावल, जि. जळगाव ८) महेंद्र वसंतराव भोईटे, रा. कोल्हेनगर, जळगाव, ९) शिवाजी केशव भोईटे, रा.पुणे यांचेविरूध्द दाखल असलेला कोथरूड पोलीस स्टेशन गुरनं. ३/२०२१, भा.दं. वि. कलम १२० (ब) ३३१, ३८४, ३७९, ४४७, ४४८, ४४९, ४५४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ५०४, ५०६ (२), ५११, १०९, ३४ या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) व ३ (४) चा अंतर्भाव करण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे म्हटले होते.
माझा गुन्हा खरा असल्याचे सिद्ध होतेय : अॅड. विजय पाटील
कोथरूड (पुणे) पोलिसांचे पथक आज जळगावात आल्याची माहिती समोर येत आहे. पथक येऊन कारवाई करतेय याचाच अर्थ माझ्या फिर्यादीत तथ्य आहेच. त्यामुळे गिरीश महाजन फिर्याद खोटी असल्याचे म्हणत होते, ते चुकीचे ठरले आहे. याचाच अर्थ उलट गिरीश महाजन हेच खोटं बोलत होते, हे सिद्ध होत आहे. तसेच पोलिसांकडून अशाच पद्धतीची धडक आणि कडक कारवाई अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार अॅड. विजय पाटील यांनी दिली आहे.