मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील पोलिस भरतीमध्ये एनसीसीचं प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी शालेय दशेत असल्यापासून NCC मध्ये सहभागी होतात. पुढे जे उमेदवार विविध टप्पे पार करीत प्रमाणपत्र मिळवतात. त्यांना लष्करात भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. याच धर्तीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अनेक विद्यार्थी शालेय दशेत असल्यापासून NCC मध्ये सहभागी होतात. पुढे जे उमेदवार विविध टप्पे पार करीत प्रमाणपत्र मिळवतात. त्यांना लष्करात भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. याच धर्तीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलिस भरतीमध्ये एनसीसीचं प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.
राज्यात ज्या उमेदवारांकडे NCC चे A सर्टिफिकेट असेल, त्याला 2 टक्के अतिरिक्त गुण पोलीस भरतीसाठी मिळतील. B सर्टिफिकेट असलेल्या तरुणाला 3 टक्के मार्क मिळतील. तर C सर्टिफिकेट असलेल्या तरुणांना 5 टक्के मार्क मिळतील.