जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनवद येथील माजी सरपंच निर्दोष पवार यांची सरपंच परिषद मुंबई तालुकाध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी बांभोरी प्र.चा .चे सरपंच सचिन बिराडे व सरचिटणीसपदी पष्टाणे येथील माजी सरपंच किशोर पाटील यांची तसेच महिला तालुकाध्यक्षपदी नांदेड येथील सरपंच पुनम प्रशांत अत्तरदे यांची तर महिला उपाध्यक्ष पदी पिंपरी येथील सरपंच सरला बडगुजर व सरचिटणीसपदी चिंचपूरायेथील सरपंच आशाबाई पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळू धुमाळ साहेब व महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई देसले तसेच जिल्हा समन्वयक श्रीकांत भाऊ पाटील जिल्हा समन्वयक बाळू चव्हाण यांच्या हस्ते घोषणा करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील आजी-माजी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य हजर होते. सर्वानुमते बहुमताने सोनवदचे माजी सरपंच निर्दोष भाऊ पवार यांची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धुमाळ यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सरपंच परिषद मुंबई ही सदैव राज्यातील व जिल्ह्यातील सरपंच यांच्या सदैव सोबत राहील.
याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष निर्दोष पवार यांनी आपल्या गावाचा तालुक्यातून जास्तीत जास्त विकास करून तालुक्यात प्रथम क्रमांकावर आपल्या गावाला नेले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तसेच त्यांच्या अनुभव तालुक्यातील अनेक सरपंचांना कामी आल्याशिवाय राहणार नाही असे सांगून जिल्हाध्यक्ष धुमाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई दिसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला सरपंच यांना गाव गाडा चालवत असताना अनेक अडचणी येत असतात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महिला म्हणून सरपंच परिषद सदैव सरपंच यांच्या पाठीशी राहील.
याप्रसंगी तालुक्यातील सळवाचे सरपंच निशा बोरोले, उपसरपंच सतीश पवार, सरपंच सरला बडगुजर, सचिन बिराडे, धाड शेरीचे ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील, चिंचपूर येथील कैलास पाटील, अनोरे येथील सरपंच स्वप्नील महाजन, बाबुळगावचे सरपंच राजूभाऊ पाटील, विशाल पाटील, बोरखेडा येथील उपसरपंच डॉक्टर विजय पाटील, अंजन्विहिरे येथील सरपंच डॉ विलास चव्हाण, अहिरे येथील माजी उपसरपंच पवन पाटील, गुलाब पाटील, येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास भिल, आशा कोल्हे, मामी पटेल, अनेक सरपंच उपस्थित होते. याप्रसंगी अनोरे चे सरपंच स्वप्नील महाजन, किशोर पाटील, सचिन भाऊ बोराडे, कैलास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले.